गेली १२ वर्ष आमचं कोकण समृद्धीची वाट बघतंय…समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाल्यावर मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

132

महाराष्ट्रातील ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आले आहे. समृद्धी महामार्ग हा कायम चर्चेचा विषय ठरला आहे. या महामार्गामुळे पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भाचा विकास होऊन तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. परंतु आता याच पार्श्वभूमीवर मराठी अभिनेता अभिजीत केळकरने पोस्ट शेअर केली आहे.
मराठी अभिनेता अभिजीत केळकरने व्यक्त केला संताप 

समृद्धी महामार्गाच्या उद्धाटनानंतर अभिजीतने शेअर केलेली ही पोस्ट सध्या सोशल मिडियामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. “आमचं कोकणही समृद्धीची वाट बघतंय गेली १२ वर्ष” असा मजकूर लिहित पुढे राग व्यक्त करणाऱ्या इमोजी टाकत अभिजीत केळकरने संताप व्यक्त केला आहे. त्याचे चाहते सुद्धा या पोस्टवर व्यक्त होताना दिसत आहेत.

समृद्धी महामार्गाप्रमाणेच मुंबई – गोवा महामार्गाचे काम सुद्धा २०१० मध्ये सुरू झाले होते असे असताना मुंबई-गोवा महामार्ग रुंदीकरणा प्रकल्पाचे काम धीम्या गतीने का होत आहे. परशुराम घाटात आजही कोकणवासीयांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तीव्र वळणांमुळे अनेकवेळा अपघात होतात यावर उपाय काय असे प्रश्न चाकरमान्यांकडून वेळोवेळी उपस्थित केले जातात. याला अनुसरून असलेली अभिजीत केळकरची पोस्ट आता चर्चेचा विषय ठरली आहे.

इन्स्टाग्राम केली पोस्ट शेअर

समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाल्यानंतर अभिजीत केळकरने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत राग व्यक्त केला.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhi Kelkar (@abhijeetkelkarofficial)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.