साहित्य संमेलनाच्या पहिल्याच दिवशी गोंधळ; मुख्यमंत्र्यांच्या भाषणाच्या वेळी वेगळ्या विदर्भासाठी घोषणा 

128
वर्ध्यात शुक्रवार, ३ फेब्रुवारीपासून ९६वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे, पहिल्याच दिवशी संमेलनात गोंधळ झाला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उदघाटन समारंभात भाषण करत असताना अचानक वेगळ्या विदर्भाच्या घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्घाटन समारंभामध्ये भाषण सुरुवात केल्यानंतर काही मिनिटांमध्येच संमेलनाचे मंडपामधील काही पुरुषांनी उठून वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्या घोषणा दिल्या. त्यानंतर या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन मंडपाबाहेर नेले. मात्र मुख्यमंत्र्यांचे भाषण समारोपाकडे आले असतानाच पुन्हा मंचाजवळच्या पुढल्या रांगेत बसलेल्या काही महिलांनी वेगवळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्या घोषणा देत लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला.

नेमके काय घडले?

मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु झाल्यानंतर अचानक काही पुरुष आंदोलकांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे सुरक्षेमध्ये तैनात असलेल्या पोलिसांचा एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी या घोषणाबाजी करणाऱ्यांना ताब्यात घेऊन मंडपाबाहेर नेले आणि पोलिसांच्या गाडीमधून जवळच्या पोलीस स्थानकामध्ये नेले. दरम्यान यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपले भाषण सुरु ठेवले आणि ते पूर्ण करत असतानाच अचानक पहिल्या काही रांगांमध्ये बसलेल्या महिला बॅनर घेऊन उभ्या राहिल्या आणि वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी घोषणाबाजी त्यांनी सुरु केली. वेगळ्या विदर्भाची मागणी करतानाच शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या महिलांनी केला.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.