आदित्य ठाकरेंनी आधी स्वः पापांचा राजीनामा द्यावा; आशिष शेलारांचा ठाकरेंवर हल्लाबोल

144

ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच वरळीत मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी वरळीतील कोळी बांधवांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला. मात्र हे कोळी बांधव नेमके कोणत्या राज्यातले होते? असा सवाल ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे. याच सवाला उत्तर देताना भाजपचे नेते आशिष शेलारांनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला. आदित्य ठाकरेंनी आधी स्वः पापांचा राजीनामा द्यावा असे आशिष शेलार म्हणाले.

नक्की आशिष शेलार काय म्हणाले?

प्रसार माध्यमांसोबत बोलताना आशिष शेलार म्हणाले की, जर त्यांना त्यांच्या मतदारसंघातील लोकं ओळखता येत नसेल, तर त्यांना मतदारसंघातल्या आपल्या मतदारांना ओळखता येत नाही म्हणून स्वः पापांचा राजीनामा द्यावा एवढंच त्यांना मी म्हणेण.

(हेही वाचा – एकनाथ शिंदे छोटी छोटी आव्हाने स्वीकारत नाही, मोठी आव्हाने स्वीकारतो! मुख्यमंत्र्यांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार)

आदित्य ठाकरेंच्या राज्यपाल बदलण्याच्या आव्हानावर शेलार म्हणाले…

तसेच हिंमत असेल तर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राज्यपाल बदलून दाखवा असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी सरकारला दिलं आहे. आदित्य ठाकरेंच्या या आव्हानाबाबत बोलताना शेलार म्हणाले की, आपण कुठल्याही पद्धतीनं न्यूजमध्ये राहिल पाहिजे, म्हणून केलेला हा आदित्य ठाकरेंचा बालीश प्रयत्न आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.