2030 पर्यंत 2 कोटी इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर धावणार; गडकरींनी सांगितला प्लॅन

198

केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मोठे भाष्य केले आहे. या दशकाच्या अखेरीस भारतीय रस्त्यांवर दोन कोटी इलेक्ट्रिक वाहने धावतील, असे म्हटले आहे. इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि भविष्यातील गतिशीलता या विषयावरील एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की, ई- मोबिलीटीमध्ये मोठी क्षमता आहे आणि गुंतवणूकदारांनी पर्यावरण वाचण्यासाठी या क्षेत्रात येऊन गुंतवणूक केली पाहिजे. 2030 पर्यंत भारतात सुमारे दोन कोटी इलेक्ट्रिक वाहने धावतील, असेही गडकरी म्हणाले. इलेक्ट्रिक वाहनांमुळे केवळ प्रदूषण कमी होण्यास मदत होणार नाही तर रोजगार निर्मितीलाही मदत होईल, ज्याचा परिणाम देशाच्या विकासावर होईल आणि भारत स्वावलंबी होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.

( हेही वाचा: तुरुंगात आलेली ऑफर मी नाकारली, नाहीतर… अनिल देशमुखांचा मोठा खुलासा )

इलेक्ट्रिक वाहनांवर भर द्या

ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण आणि जलप्रदूषण टाळण्यासाठी इलेक्ट्रिक बसला चालना देणे गरजेचे आहे. 40 टक्के प्रदूषण वाहतूक क्षेत्रामुळे होते. त्यामुळे इलेक्ट्रिक बसेसला चालना देऊन हे प्रदूषण कमी करता येईल. इलेक्ट्रिक वाहनांमुळे देशात हरित आणि स्वच्छ गतिशीलतेला चालना मिळण्यास मदत होईल, असेही गडकरी यावेळी म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.