उद्धव ठाकरेंचे मशाल चिन्ह सुद्धा धोक्यात? समता पक्षाने केला दावा

113

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर शुक्रवारी निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय दिला असून शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दोन्ही एकनाथ शिंदे यांनी देण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिल्यामुळे आता उद्धव ठाकरे गटाला मशाल या चिन्हाचा वापर करावा लागणार आहे. परंतु आता ठाकरे गटाच्या अडचणी आणखी वाढणार असून मशाल चिन्हावर समता पक्षाने दावा केला आहे.

( हेही वाचा : उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक; आमदार-खासदार मुंबईच्या दिशेने रवाना)

उद्धव ठाकरे गटाला देण्यात आलेलं मशाल हे चिन्ह गोठवावे अशी मागणी समता पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबत समता पक्षाचे उदय मण्डल यांच्या नेतृत्वात समता पक्षाचे शिष्टमंडळ आयुक्तांची भेट घेणार आहे.

मशाल चिन्हावर समता पक्षाचा दावा

अंधेरी पोटनिवडणूकीसाठी निवडणूक आयोगाने अंतिम निकाल येईपर्यंत धनुष्यबाण हे चिन्ह आणि पक्षाचे नाव गोठवले होते. यावेळी ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आले होते. परंतु समता पक्षाने या चिन्हावर दावा केल्याने ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.