आता ‘द गोवा फाईल्स’ चित्रपटाची मागणी! कोणी आणि कसे केले होते हिंदूंवर अत्याचार?

93

३० वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदू पंडितांचा वंशविच्छेद करण्यात आला होता. त्यावेळी काँग्रेसधार्जिण्या विचारधारेमुळे हिंदूंवर झालेल्या अनन्वित अत्याचाराला तोंड फुटले नाही, मात्र देशात आज जेव्हा राजकीय पातळीवर अमुलाग्र सत्ताबदल झाला आणि पहिल्यांदा काश्मीरमधील हिंदू संहाराचे सत्यकथन ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाद्वारे करण्यात आले. हिंदूंचा वंशविच्छेद झालेला काश्मीर हा एकच भाग नाही, तर गोव्यातही हिंदूंचा नरसंहार झाला होता, याची आठवण करून देण्यात आली आहे.

Goa diaries 2

सुभाष वेलिंगर यांनी काय केली मागणी?

गोव्याच्या राजकारणात एक लक्षवेधी व्यक्तिमत्व म्हणजे सुभाष वेलिंगकर आहे. संघाच्या मुशीत जडणघडण झालेले वेलिंगकर स्थानिक राजकारणातील मतभेदामुळे भाजपपासून वेगळे झाले, तरी विचारधारा सोडली नाही. वेलिंगकर यांनी ट्विट करून गोवा फाईल्स नावाने चित्रपट काढण्याची मागणी केली आहे. ‘आता गोवा फाईल्स ही येऊ द्यात! धर्माच्या नावाने चर्च संस्थेने पोर्तुगीज सत्ता टिकवण्यासाठी २५० वर्षे गोवा इन्क्विझिशन खाली केलेला हिंदू वंशविच्छेद पुढच्या पिढ्यांना कळू द्यात!…अजून बाकी आहे! जीनांचे ‘direct action’, फाळणी, नौखाली, हैद्राबाद, केरळचे मोपला, गांधीजी व इंदिरा गांधी हत्येनंतरची सगळीच हिंदू हत्याकांडे… हिंदूंना माहित कुठे आहेत?, असे वेलिंगकर यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

(हेही वाचा महाराष्ट्राला काश्मीरची साद!)

काय आहे गोवा इन्क्विझिशन?

वर्ष १५६० ते १८१२ या २५२ वर्षांच्या काळात पोर्तुगिजांकडून चालवण्यात आलेल्या इन्क्विझिशनद्वारे हिंदूंना ख्रिश्चन बनवण्यात आले. ख्रिश्चन झालेल्या हिंदूंनी ख्रिश्चन धर्माचे पालन न केल्यास त्यांना अत्यंत अमानुष पद्धतीने शिक्षा दिली जात होती. हा इतिहास भारतीयांना कधीही शिकवला गेला नाही आणि जात नाही. यावर चर्चाही केली जात नाही. आज गोव्यातील चर्च जी गोव्याची संस्कृती म्हणून सांगितली जात आहे, ती संस्कृती नसून मानवी विकृती होती आणि चर्च संस्थांचा हाच अमानवी इतिहास कुठेही सांगितला जात नाही, त्यामुळे काश्मीर फाईल्सच्या निमित्ताने हा इतिहास उजेडात यावा, अशी मागणी होवू लागली आहे.

Goa diaries 1

(हेही वाचा काश्मिरी पंडितांवरील अत्याचार लोकशाहीला कलंक!)

अशा प्रकारे हिंदूंवर झाले होते अत्याचार! 

  • पोर्तुगीज जबरदस्ती करूनही जे हिंदू बाणेदारपणे धर्मांतर नाकारत असत, त्यांना जाळून टाकले जाई. काही जण ख्रिश्चन धर्म स्वीकारत त्यांना सोडून दिले जाई. पण तोही अपमानच होता. यांच्या शिक्षा भयंकर होत्या. दोषी माणसाला हात मागे बांधून कप्पीला अडकवले जात. आणि अर्धा तास वर खाली वर खाली करत. हात बांधलेले असत त्यामुळे सांधे अवघडून जात. वेदनांनी तो किंचाळायला लागत किंवा त्याला लोखंडी कांबेला बांधून सतत पाण्याचा मारा केला जात.
  • दोषी आढळलेल्यांना अधांतरी टांगले जात. त्यांच्या पायांना ज्वलनशील पदार्थ बांधत आणि खाली आग पेटवत. तो माणूस गुन्हा कबूल करेपर्यंत आग वाढवत नेत.

Goa diaries 3

  • स्त्रियांना फार क्रूर अत्याचारांना सामोरे जावे लागले. स्त्रियांवर लोकांची झुंबड उडे. त्यावेळी त्या स्त्रिचे हालहाल केले जायचे. त्यांचे स्तन कापले जायचे, त्यांना नग्न करून त्यांच्या शरीरात लांब खिळे घुसवले जात.
  • गर्भधारणा झालेल्या स्त्रियांवर इतका अमानुष अत्याचार केला जात की, त्यात त्यांचा आधी गर्भपात होत नंतर त्या स्त्रिचा जीव जात असे.
  • आरोपींना त्यांच्या नातेवाइकांसमोर टॉर्चर केले जात असे. आरोपींच्या पापण्या, हातपाय अत्यंत क्रूरतेने कापण्यात येत असत. फक्त धड आणि डोकं शिल्लक राहिलं तरी माणूस जिवंत राहत असे.
  • डियागो दे बोर्डा (एक प्रिस्ट) त्याचा सल्लागार व्हीकर जनरल, मिगुएल व्हाज ह्यांनी हिंदूंना टॉर्चर करण्यासाठी ४१ मुद्द्यांचा एक आराखडा तयार केला होता.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.