दिलासा! ‘या’ जिल्ह्यातून कोरोना झाला हद्दपार

111

मार्च महिन्याच्या अखेरचा आठवडा सुरु होत असताना राज्यातील चार जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत. नंदुरबार, धुळे, हिंगोली, यवतमाळ या जिल्ह्यांत आता एकही कोरोनाचा रुग्ण नसल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

सांगली, जालना, भंडारा आणि वर्ध्यात आता एकच रुग्ण उरला आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आता दहाच्या आत कोरोना रुग्णांची संख्या उरली आहे. परभणी आणि नांदेडमध्ये ९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. लातूर, गडचिरोली, पालघरमध्ये ८, गोंदियात ७, अकोल्यात ५, उस्मानाबाद, अमरावती, जळगाव आणि रत्नागिरीमध्ये ४ तर चंद्रपूर आणि वाशिममध्ये २ रुग्ण उरलेत.

दोन आकडी रुग्ण संख्या असलेले जिल्हे

औरंगाबाद -३९, नागपूर- ३२, रायगड- २३, सोलापूर -१४, सिंधुदुर्ग -१३, नाशिक- ७२, बीड- १७, बुलडाणा -१५

शंभरीपार कोरोना रुग्णसंख्या असलेले जिल्हे

  • पुणे – ४२०
  • मुंबई -२१८
  • अहमदनगर – १३७
  • ठाणे – १५२

(हेही वाचा- पुणे-ठाण्यासह 23 ठिकाणी आयकरचे छापे; 224 कोटींपेक्षा अधिक मालमत्ता जप्त)

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण – ९८.११ टक्के

राज्यातील मृत्यूदर – १.८२ टक्के

राज्यात सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या – १ हजार ३५४

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.