आयपीएल कोण जिंकणार गावसकरांची ‘ही’ भविष्यवाणी

75

आयपीएलच्या 15 व्या हंगामाला शनिवार 26 मार्च सुरुवात होणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये 8 ऐवजी 10 संघांचा समावेश असणार आहे. आता लखनौ आणि गुजरात या दोन संघाचा समावेश झाला आहे. दरम्यान, भारताचे दिग्गज माजी खेळाडू सुनील गावस्कर यांनी यंदाचा आयपीएल चषक कोण जिंकणार याविषयी अंदाज व्यक्त केला आहे.

( हेही वाचा : केंद्राच्या ‘या’ योजनेतून देशातील झोपडपट्ट्यांची संख्या घटली ! )

गावसकरांची भविष्यवाणी

दिल्ली कॅपिट्ल्स संघ यंदा आयपीएल चषकावर नाव कोरेल, असा अंदाज सुनील गावस्कर यांनी वर्तवला आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वात दिल्लीचा संघ पहिल्यांदा आयपीएलचा चषक जिंकेल. मात्र, यंदाच्या आयपीएलमध्ये पंजाब संघाची कामगिरी निराशाजनक होऊ शकते, असेही गावस्कर म्हणाले.

विशेष सुरक्षा

आयपीएल क्रिकेट सामन्यासाठी मैदानावर तसेच हॉटेल्सवर मुंबई पोलिसांकडून आवश्यक ती सुरक्षा पुरविण्यात येत आहे. अतिरेक्यांकडुन हॉटेल ट्रायडेंट, वानखेडे स्टेडीयम, हॉटेल ट्रायडेंट ते वानखेडे स्टेडीयमपर्यंतच्या मार्गाची रेकी झाल्याबाबत सध्या कोणत्याही संस्थेकडून इनपुट किंवा माहिती प्राप्त झालेली नाही. तरी आयपीएल क्रिकेट सामन्यादरम्यान स्टेडियमवर, हॉटेलवर आणि मार्गावर पुरेसा सुरक्षा बंदोबस्त मुंबई पोलिसांकडून पुरविण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.