Supriya Sule : मुसलमानांनी २ पेक्षा जास्त मुले जन्माला का घालावी; चक्क सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण…

525

सध्या भारताची लोकसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. असे असले तरी ही लोकसंख्या मुसलमानांमुळे वाढत आहे, कारण हिंदूंना दोन पेक्षा अधिक अपत्य जन्माला घातले तर त्या तिसऱ्या अपत्याला सरकारी सवलती मिळत नाही, तसेच पाल्यांना काही शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही, दुर्दैवाने हा नियम मुसलमानांना नाही. त्यामुळे मुसलमान बिनदिक्कतपणे मुले जन्माला घालत आहेत. त्यावर आता सामाजिक पातळीवर चर्चा घडू लागली आहे. केंद्र सरकार कायदा करण्याच्या विचारात आहे. मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी मात्र त्याचे उघडपणे समर्थन केले आहे आणि त्यासाठी त्याचे कारणही दिले आहे. त्याविषयीचा व्हिडीओ सध्या ट्विटरवर जोरदार व्हायरल होत आहे.

सध्या केंद्र शासन समान नागरी कायदा आणण्याचा विचार करत आहे. त्यात अपत्य जन्माला घालण्याविषयी ज्या अटी हिंदूंना असतील त्याच मुसलमानांनाही लागू होतील. विशेष म्हणजे मुसलमानांना अधिकची अपत्य जन्माला घालण्यासाठी प्रतिबंध घालण्यासाठी कायदा करण्याविषयी चर्चा सुरु आहे. यावर माध्यमांनी सुप्रिया सुळे यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी, मला आता दोनच मुले आहेत, आता माझी दोन्ही मुले कॉलेजला गेल्यावर वाटते मला अजून २-४ मुले असती तर घर एवढे मोकळे दिसले नसते, असे म्हणत याचे समर्थन केले आहे. हे आता सर्वत्र व्हायरल होत आहे.

(हेही वाचा Love Jihad : १७ वर्षीय हिंदू मुलीचा लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह; शादाबवर ‘लव्ह जिहाद’चा आरोप)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.