Destination Wedding : डेस्टिनेशन वेडींगसाठी आता सरकार करणार जोडप्यांना मदत

141

भारत हे जगभरात प्रीमियम वेडींग डेस्टिनेशन म्हणून ओळखला जाणारा देश आहे. सरकारच्या या उपक्रमाचे उद्दिष्ट भारताला जगभरात लग्नासाठीचे उत्तम स्थळ म्हणून दाखवणे आणि लग्न उद्योगातील प्रचंड क्षमतांचा वापर करणे हा आहे.

या विशेष मोहिमेचा शुभारंभ करताना, केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी म्हणाले, “आजचा दिवस एका उल्लेखनीय प्रवासाची सुरुवात आहे. भारताला जगभरातील विवाह स्थळांचे प्रतीक म्हणून स्थान देण्याचे मिशन. या मोहिमेचा शुभारंभ करून, मी जगभरातील जोडप्यांना आमच्या अविश्वसनीय राष्ट्रातील मंत्रमुग्ध करणारी लग्नाची ठिकाणे शोधण्यासाठी आमंत्रित करतो.”

हा उपक्रम डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया प्रमोशन, वेडिंग प्लॅनर्ससह, प्रभावकांसह भौतिक (physical) आणि आभासी (virtual) कार्यक्रमांचा समावेश असलेल्या धोरणांवर आधारित आहे, असे निवेदनात म्हटले आहे. या मल्टीफंक्शनल पध्दतीचे उद्दिष्ट भारतातील विवाह सोहळ्यांबद्दलची धारणा पुन्हा परिभाषित करणे, शाही समारंभा पलीकडे जाऊन भव्य लग्न सोहळा साजरा करणे, असेही त्यात म्हटले आहे.

(हेही वाचा G20 बैठकीत झळकणार ऋग्वेदाचे हस्तलिखित)

मोहिमेची सुरुवात भारतभरातील सुमारे २५ प्रमुख लग्नस्थळांची प्रोफाइल करून झाली आहे, ज्यामध्ये भारत जोडप्यांच्या लग्नाच्या आकांक्षांशी कसा सुसंवाद साधतो हे दर्शविते. चित्तथरारक हिमालयीन लँडस्केपपासून ते पवित्र धार्मिक विधींपर्यंत, स्वादिष्ट पाक अनुभवांपासून ते अत्याधुनिक पायाभूत सुविधांपर्यंत, ही मोहीम भारताची भव्यता दर्शवते. भविष्यात, सरकार हॉटेल साखळ्यांसोबत जोडण्याची योजना आखेस आणि या ठिकाणी लग्न करण्याची योजना आखत असलेल्या जोडप्यांना सवलत देईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.