Maratha Reservation : ओबीसींवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होणार नाही : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ओबीसींचे आरक्षण कमी होणार नाही वा काढूनही घेतले जाणार नाही

110
Maratha Reservation : ओबीसींवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होणार नाही : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

एकीकडे मराठा समाजाला (Maratha Reservation) सरसकट आरक्षण देण्यासाठी दिलेली ४ दिवसांची मुदत संपताच उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी (१० सप्टेंबर) सलाइन काढली तसेच पाणी पिणेही बंद केले. तर दुसरीकडे मराठा आरक्षणाबाबत तोडगा काढण्यासाठी आज म्हणजेच सोमवार ११ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी (Maratha Reservation) सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख – प्रतिनिधी हजर राहणार असल्याची माहिती मिळत आहे. ही बैठक सह्याद्री अतिथीगृहात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणामुळे ओबीसींवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होणार नसल्याचे सांगितले.

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींवर कोणत्याही स्थितीत अन्याय होणार नसल्याची ग्वाही दिली. ओबीसी व मराठा (Maratha Reservation) या 2 समाजात संघर्षाची ठिणगी पडेल असा कोणताही निर्णय सरकार घेणार नाही. त्यामुळे ओबीसी समाजाने काळजी करू नये, असे फडणवीस म्हणाले.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार काही झाले तरी ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही. ओबीसींचे आरक्षण (Maratha Reservation) कमी होणार नाही वा काढूनही घेतले जाणार नाही. याबाबत ओबीसींनी भीती बाळगू नये. ओबीसी समाजानेही या प्रकरणी कोणताही गैरसमज करून घेऊ नये.

(हेही वाचा – Maratha Reservation : मराठा आरक्षण न्यायालयात टिकणारे असावे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली सरकारची भूमिका)

राजकारणापलिकडचा विचार महत्त्वाचा

राज्यात सामाजिक ऐक्याला तडा जाईल असे प्रसंग निर्माण होतात तेव्हा सरकार व विरोधी पक्षांनी राजकारणापलिकडे जाऊन ते मिळून सोडवायचे असतात. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत कुठल्या मार्गाने पुढे जाता येईल आणि मराठा समाजाचे (Maratha Reservation) किंवा वेगवेगळ्या समाजातील प्रश्न कसे सोडवता येईल यावर विचार केला जाईल. मनोज जरांगे पाटील व मराठा समाजाच्या इतर काही संघटनांचे अनेक प्रश्न आहेत. या सगळ्यांचा एकत्रित विचार करून यावर राजकारण न करता समाज हिताचा निर्णय कसा घेता येईल याचा विचार आम्ही करू, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.