Arvind Kejriwal : एकीकडे ईडीच्या रडारवर तर दुरीकडे गुजरातचा दौरा ; नेमकं चाललंय काय?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांचा आम आदमी पक्ष, जे प्रामाणिकपणाचे विजेते असल्याचा दावा करून सत्तेत आले होते, ते आता भ्रष्टाचाराचे दुसरे नाव बनले आहेत - अनुराग ठाकूर

226
Arvind Kejriwal यांना हायकोर्टाचा दणका, ईडीने केलेली अटक योग्य ठरवली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. एकीकडे ईडीकडून तीन समन्स मिळूनही चौकशीला हजर न राहिल्याने ईडी केजरीवाल यांना चौथे समन्स बजावू शकते. तर मात्र दुसरीकडे मुख्यमंत्री केजरीवाल शनिवार ६ जानेवारीपासून तीन दिवसांचा गुजरात दौरा करणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमध्ये केजरीवाल (Arvind Kejriwal) जाहीर सभा घेण्याची, तुरुंगात असलेले आपचे नेते चैत्र वसावा यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा – Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर करण्यात आले वाहतुकीत बदल ;जाणून घ्या काय आहे कारण)

आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी यापूर्वी ईडीसमोर हजर राहण्यास नकार दिला होता आणि एजन्सीचा दृष्टीकोन कायदा, समानता किंवा न्यायाच्या कसोटीवर टिकत नाही असे म्हटले होते. समन्स बेकायदेशीर असल्याचा त्यांचा आरोप फेटाळत एजन्सी केजरीवाल यांना पुन्हा एकदा नव्याने समन्स पाठवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अटक करून प्रचार करण्यापासून रोखायचे आहे –

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात समन्स बजावले आहे. या प्रकरणात कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ईडीला अद्याप पुरावे सापडलेले नाहीत, तर गेल्या दोन वर्षांपासून दारू घोटाळ्याची चर्चा सुरू आहे आणि तपास संस्थेने माझ्या घरावर अनेक छापे टाकले आहेत.

(हेही वाचा – CBSE Board Exam 2024 : सीबीएसई बोर्डाकडून १०वी आणि १२वीच्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर)

प्रामाणिकपणा हीच माझी संपत्ती –

तपास संस्थेने बनावट खटल्यात आपच्या अनेक नेत्यांना तुरुंगात टाकले आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला. तर आता चौकशीच्या निमित्ताने त्यांना अटक करून लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्यापासून थांबवणे हा भाजपचा उद्देश आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) पेढे म्हणाले की, प्रामाणिकपणा ही त्यांची सर्वात मोठी संपत्ती आहे. खोटे आरोप आणि बनावट समन्स पाठवून प्रामाणिकपणा दुखावला जात आहे.

बेकायदेशीर समन्सचे पालन करावे का ?

ईडीचे समन्स बेकायदेशीर असल्याचे सांगून केजरीवाल (Arvind Kejriwal) म्हणाले की, “त्यांनी या प्रकरणात ईडीला काही प्रश्न विचारले आहेत, परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. याचा सरळ अर्थ असा आहे की तपास संस्थेकडे दारू घोटाळ्याचा कोणताही ठोस पुरावा नाही. एजन्सीचे समन्स बेकायदेशीर आहेत. बेकायदेशीर समन्सचे पालन करावे का, असा प्रश्न मुख्यमंत्री केजरीवाल यांनी विचारला आहे. जर कायदेशीररित्या योग्य समन्स आले तर मी पूर्ण सहकार्य करेन असे केजरीवाल यांनी सांगितलं.

(हेही वाचा – भाजपाच्या जडणघडणीत प्रमुख सहभाग असणारे Murali Manohar Joshi)

केजरीवाल म्हणजे भ्रष्टाचाराचे दुसरे नाव – अनुराग ठाकूर

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी गुरुवारी सांगितले की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि त्यांचा आम आदमी पक्ष, जे प्रामाणिकपणाचे विजेते असल्याचा दावा करून सत्तेत आले होते, ते आता भ्रष्टाचाराचे दुसरे नाव बनले आहेत.

केजरीवाल यांचा गुजरात दौरा –

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी ते ६,७ आणि ८ जानेवारीला गुजरातला भेट देणार आहेत. कामगारांचे अधिवेशन आणि जाहीर सभेलाही ते संबोधित करतील.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.