Arvind Kejriwal : भाजपाचा विजय झाला, उद्धव ठाकरेंसह विरोधी पक्षाचे नेते तुरुंगात असतील, मोदींच्या मोहिमेविषयी केजरीवाल काय म्हणाले?

183
Arvind Kejriwal : भाजपाचा विजय झाला, उद्धव ठाकरेंसह विरोधी पक्षाचे नेते तुरुंगात असतील, मोदींच्या मोहिमेविषयी केजरीवाल काय म्हणाले?
Arvind Kejriwal : भाजपाचा विजय झाला, उद्धव ठाकरेंसह विरोधी पक्षाचे नेते तुरुंगात असतील, मोदींच्या मोहिमेविषयी केजरीवाल काय म्हणाले?

भाजपाने एका वर्षात आम आदमी पक्षाचे ४ मोठे नेते तुरुंगात टाकले. पंतप्रधान मोदींनी आपला पूर्ण नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला. मला तुरुंगात टाकून मोदी म्हणतात की, ते भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत आहेत. पण त्यांनी स्वतःच्या पक्षातच देशातील सर्वात मोठ्या भ्रष्टाचाऱ्यांना, चोरांना आश्रय दिला. ज्यांच्यावर १० दिवसांपूर्वी ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केला, त्यांनाच पक्षात घेऊन उपमुख्यमंत्रीपद दिलं आणि म्हणतात, मी भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात लढाई लढायची असेल, तर मोदींनी केजरीवालांकडून शिकावे, असे आवाहनही अरविंद केजरीवाल यांनी केले, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी तिहार तुरुंगातून जामिनावर बाहेर आल्यानंतर केली. पक्षाच्या मुख्यालयात जाहीर सभेला संबोधित करत असताना त्यांनी भाजपा आणि मोदींवर अनेक आरोप केले. (Arvind Kejriwal)

पंतप्रधान मोदी हे ‘एक राष्ट्र, एक नेता’ मोहीम राबवत आहेत, अशी टीका केजरीवाल यांनी केली. ‘मला तुरुंगात टाकून त्यांनी देशातील सर्व विरोधकांना संदेश दिला. जर हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल यांना आम्ही तुरुंगात टाकू शकतो, तर ४ जून रोजी सत्ता आली, तर देशातील कोणत्याही नेत्याला आम्ही तुरुंगात टाकू शकतो. जर भाजपाची सत्ता आली तर ममता बॅनर्जी, स्टॅलिन, उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षाचे नेते तुरुंगात असतील’, असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.

हेही वाचा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.