लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीसंबंधी Sanjay Shirsat यांचे महत्त्वाचे वक्तव्य; म्हणाले…

224

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विधानसभा निवडणुकीचे वेध लागणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी महत्वाचे वक्तव्य केले. ६ जूननंतर आमच्याकडे इनकमिंग सुरू होईल. त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात अनेकजण आहेत. माझ्याही संपर्कात आहेत. आमच्याच नियमित चर्चाही होते. योग्यवेळेला योग्य निर्णय घेण्याची शिंदेंची स्ट्रॅटेजी आहे. त्यानुसार ते निर्णय घेतील, असे म्हणाले.

दरम्यान, या काळात अजित पवार यांच्याकडेही मोठ्या प्रमाणात इनकमिंग होणार असल्याचे सूतोवाच त्यांनी दिले आहेत. अजितदादांकडेसुद्धा अनेकजण येणार आहेत. कारण, आता शरद पवार गटाला कंटाळले आहेत. त्या गटात चाललेली हुकूमशाही, मीपणा आणि अहंभाव यामुळे आमदार कंटाळले. ते अजित दादांच्या संपर्कात आहेत, असेही संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले.

(हेही वाचा Lok Sabha Election : दिल्लीत भाजपाला किती जागा मिळणार? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी केली भविष्यवाणी)

विधानसभा निवडणुकीचे वेध

२० जून २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदे त्यांच्या काही आमदारांसह बाहेर पडले. त्यांच्या गटाला निवडणूक आयोगाने मूळ शिवसेनेचा दर्जा दिला. बरोबर वर्षभराने म्हणजेच १ जुलै रोजी अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड करून सत्ताधारी पक्षाला समर्थन दिले. यामुळे राष्ट्रवादीतही दोन गट निर्माण झाले. परिणामी राज्यात मोठ्या प्रमाणात सत्तासंघर्ष निर्माण झाला. या सत्ता संघर्षामुळे लोकसभा निवडणूक चुरचीशी ठरली. ऐनवेळी अनेक इच्छुक उमेदवारांनी पक्षांतर केले. त्यांच्याबरोबर अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारीही गेले. आता विधानसभा निवडणुकीतही तेच होणार असल्याची शक्यता आहे. राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक प्रचंड चर्चेची आणि हायवोल्टेज राहणार आहे. त्यामुळे कोणत्या पक्षात कोण जाणार याकडे सर्वांचं लक्ष आहे, असेही शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.