HeatWave : सूर्य आग ओकतोय! २४ तासात, दिल्लीत १४ तर उत्तर प्रदेशमध्ये ८१ लोकांचा मृत्यू

106
HeatWave : सूर्य आग ओकतोय! २४ तासात, दिल्लीत १४ तर उत्तर प्रदेशमध्ये ८१ लोकांचा मृत्यू
HeatWave : सूर्य आग ओकतोय! २४ तासात, दिल्लीत १४ तर उत्तर प्रदेशमध्ये ८१ लोकांचा मृत्यू

देशात गेल्या 24 तासात दिल्लीत 14 लोकांचा तर उत्तर प्रदेशमध्ये तब्बल 81 लोकांचा मृत्यू (HeatWave) झाला आहे. यामुळे उत्तर प्रदेशमधल्या (Uttar Pradesh) अनेक जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये सूर्य आग ओकतोय. उष्णतेच्या लाटेने (Heat Wave) राज्यात कहर केला आहे. अनेकजणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (HeatWave)

रुग्णांची प्रकृती गंभीर

जून महिन्यात उष्माघाताच्या (Heat Stroke) रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रुग्णालयातील बेडची संख्या लक्षात घेता ज्या रुग्णांची प्रकृती गंभीर आहे, त्यांनाच दाखल करुन घेतलं जात आहे. ज्या रुग्णांची प्रकृती काहीशी स्थिर आहे, त्यांना औषधे देऊन घरी पाठवले जात आहे. (HeatWave)

उत्तर प्रदेशला सर्वाधिक चटके

उत्तर प्रदेशच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार एका कानपूरमध्ये 13 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर फतेहपूरमध्ये 12, चित्रकुटमध्ये 9, उन्नावमध्ये 6, बांदामध्ये 4, उरईमध्ये 6, इटावा, प्रतापगडमध्ये 4, तर बरेली, प्रयागराज आणि कौशंबी जिल्ह्यात प्रत्येक एकाचा मृत्यू झाला आहे. वाराणसी, मऊ, गाजीपूर, मिर्झापूर, चंदौली, जौनपूर, बलिया, सोनभद्र या जिल्ह्यात 23 लोकांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढचे चार दिवस उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळण्याची चिन्हे नाहीत. यामुळे अनेक जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. (HeatWave)

नोएडात 14 लोकांचा मृत्यू

दुसरीकडे नोएडात गेल्या 24 तासात 14 लोकांचा संशयास्पद मृत्यू झालाय. उष्माघाताने या सर्वांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. नोएडात 6 ते 7 अज्ञात मृतदेह आढळून आले आहेत. पोस्टमॉर्टम नंतर त्यांच्या मृत्यूचं खरं कारण समजू शकेल असं नोएडाच्या CMO रेनू अग्रवाल यांनी म्हटलंय. (HeatWave)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.