Mumbai Metro Line 3 साठी जायकाकडून कर्ज, भारत सरकारने केली करारावर स्वाक्षरी

137
Mumbai Metro Line 3 साठी जायकाकडून कर्ज, भारत सरकारने केली करारावर स्वाक्षरी

भारत सरकारद्वारे मुंबई मेट्रो लाईन ३ साठी जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्था (जायका) यांच्या सोबत अर्थ सहाय्याकरिता कर्जाच्या पाचव्या व अंतिम टप्प्याच्या वितरणासाठी करार करण्यात आला. भारत सरकारच्यावतीने आर्थिक कार्य विभागाच्या अतिरिक्त सचिव मनीषा सिन्हा आणि जपान सरकारच्यावतीने जपानचे राजदूत हिरोशी सुझुकी यांनी कर्ज करारावर स्वाक्षऱ्या केल्या. कॉर्पोरेशनसाठी निधी मिळण्याच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. (Mumbai Metro Line 3)

मागील २९ फेब्रुवारी २०२४ रोजी दिलेल्या भारत सरकारच्या मान्यतेनुसार मुंबई मेट्रो मार्ग-३ चा सुधारित प्रकल्प खर्च ३७,२७६ कोटी रूपये इतका आहे. यापैकी जायकाचे कर्ज ५७.०९% म्हणजे २१,२८० कोटी रूपये आहे. जायका कर्ज कराराच्या पाचव्या टप्प्याची रक्कम ¥ ८४ अब्ज म्हणजेच ४६५७ कोटी रुपये असून, २०१४ पासून सुरू झालेल्या निधी वितरणाची याद्वारे समाप्ती झाली आहे. पहिल्या टप्प्याची रक्कम १७ सप्टेंबर २०१३ रोजी स्वाक्षरी करण्यात आली. (Mumbai Metro Line 3)

(हेही वाचा – सर्वोत्कृष्ट कृषी राज्य म्हणून महाराष्ट्राची निवड; CM Eknath Shinde यांना मिळणार पुरस्कार)

“जायका कर्ज कराराच्या अंतिम हप्त्याची पूर्तता म्हणजे मेट्रो लाइन-३ प्रकल्पाला जायकाचे अटळ समर्थन आणि वचनबद्धता दर्शविते. प्रकल्पाच्या सुरुवातीपासून जायकाचे अमूल्य सहकार्य मिळाले आहे, शेवटच्या कर्ज टप्प्याच्या वितरणानंतर प्रकल्पाचा उर्वरित कामांना नक्कीच गती प्राप्त होईल,” असे एमएमआरसीचे नियोजन आणि रिअल-इस्टेट विकास/एनएफबीआर यांचे संचालक आर. रमणा यांनी सांगितले. (Mumbai Metro Line 3)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.