Water Supply : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील साठा आतापर्यंत ५३ टक्के

1119
Water Supply : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील साठा आतापर्यंत ५३ टक्के
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याच्या पातळीत आता चांगल्याप्रकारे वाढ होत असून मंगळवारी या सर्व धरण आणि तलावांमध्ये तब्बल ५३.१२ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मंगळवारी दिवसभरात जमा झालेला एकूण पाणीसाठा हा ७ लाख ६८ हजार ८४७ दशलक्ष लिटर एवढा झाला आहे. मागील आठ दिवसांत तलावातील पाणीसाठा सुमारे १७ टक्क्यांनी वाढला गेला आहे. तलावातील हा साठा आता एकूण १९७ दिवस पुरेल इतका झाला आहे. अजून दोन महिने शिल्लक असून आतापर्यंत ५३ टक्के जमा झालेला हा पाणीसाठा सप्टेंबर अखेर पर्यंत १०० टक्क्यांची पातळी पार करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. (Water Supply)
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सर्व धरणांमधून मुंबईकरांना दिवसाला ३९०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जात आहे. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी एकूण १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर एवढा पाण्याचा साठा आवश्यक आहे. त्यातुलनेत यंदा ७ लाख ६८ हजार ८४७ दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा २३ जुलै २०२४ पर्यंत जमा झाला आहे. तर मागील वर्षी याच कालावधीत ५०.१८ टक्के अर्थात ७ लाख २६ हजार २७६ दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा होता. तर त्याआधीच्या म्हणजे सन २०२२ मध्ये ८७.४५ टक्के अर्थात १२ लाख ६५ हजार ६५७ दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा जमा झाला होता.  (Water Supply)
तुळशी तलाव यापूर्वीच भरला आहे. हा ८३ टक्के भरला असून तानसा ९१.५५ टक्के एवढा तलाव भरला आहे. तर विहार तलाव ८८.४० टक्के भरला आहे. मात्र, सर्वात जास्त पाण्याची मागणी पूर्ण करणारा भातसा धरण ५२.०६ टक्के, मोडक सागर ७५.४६ टक्के, मध्य वैतरणा ४७.०३ टक्के एवढा भरला आहे. मागील काही दिवसांपासून गत वर्षीच्या पाणी साठ्याच्या तुलनेत यंदा निम्म्यावर आलेला हा पाणीसाठा आता झपाट्याने वाढू  लागला असून आता हा साठा मागील वर्षाच्या एकूण साठ्याच्या अधिक जमा झाला आहे. (Water Supply)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.