Vidhan Sabha Election : राष्ट्रवादीची ‘चांदा ते बांदा अजितदादा’ यात्रा

110
Vidhan Sabha Election : राष्ट्रवादीची 'चांदा ते बांदा अजितदादा' यात्रा

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या युवक आघाडीच्या वतीने ‘चांदा ते बांदा अजितदादा’ यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेचा प्रारंभ ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात चंद्रपूर येथून करण्यात येणार आहे तर समारोप सिंधुदुर्ग मध्ये करण्यात येणार आहे. (Vidhan Sabha Election)

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण म्हणाले, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षात दमदार कामगिरी करत आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांचे ग्रामीण भागापर्यंत जाळे पोहचले आहे. या माध्यमातून सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘चांदा ते बांदा अजितदादा’ यात्रा काढण्यात येणार आहे. वित्तमंत्री या नात्याने अजित पवार यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात अर्थसंकल्प सादर केला होता. या अर्थसंकल्पात महिला मुली आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष योजना जाहीर केल्या होत्या. तसेच अन्य योजनांची माहिती लोकांपर्यंत नेण्यासाठी ही यात्रा प्रयत्न करणार आहे. (Vidhan Sabha Election)

(हेही वाचा – UPSC Chairman : प्रीती सुदान यूपीएससीच्या नव्या अध्यक्ष)

यात्रेच्या मार्गावर युवक मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आणि ज्येष्ठ पदाधिकारी या मेळाव्यांना उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. यात्रेसाठी रथ तयार केला असून या रथावर विविध शासकीय योजनांची माहिती दर्शविण्यात आली आहे, अशी माहिती सुरज चव्हाण यांनी दिली. (Vidhan Sabha Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.