‘लाडक्या बहिणी’ला Love Jihad विरोधी कायद्याचे संरक्षण द्या!

131
‘लाडक्या बहिणी’ला Love Jihad विरोधी कायद्याचे संरक्षण द्या!

श्रद्धा वालकर (Shraddha Walker) हिच्या शरीराचे तुकडे तुकडे करून अफताबाने फ्रिजमध्ये ठेवले, या घटनेला वर्ष उलटून गेले, तरी अजूनही लव्ह जिहादच्या घटना थांबलेल्या नाहीत. नॅशनल रायफल शूटर तारा सहदेवपासून ते आता उरणच्या यशश्री शिंदेपर्यंत ही यादी थांबणारी नाही. प्रेमाला धर्म नसतो, असा युक्तीवाद केला जातो. त्याच प्रेमामुळे एखाद्या हिंदु युवतीच्या मृतदेहाचे तुकडे-तुकडे होऊन फ्रिजमध्ये जाणार असतील, तर… कोणाचा अत्याचार झालेला मृतदेह कुत्र्यांना लचके तोडण्यासाठी फेकला जात असेल तर… ते प्रेम कसे समजावे? ते नक्कीच प्रेम नाही, तो काफिरांना संपवण्यासाठी जाणीवपूर्वक केलेला जिहाद! सर्वधर्मसमभावाचा पुरोगामी बुरखा पांघरून, प्रेमाच्या आणाभाका घेऊन स्वतःला मरणाच्या दारात नेऊन ठेवणाऱ्या हिंदु युवतींना काय म्हणावे? लव्ह जिहादपासून हिंदु युवतींचे रक्षण करण्यासाठी अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना प्रयत्न करत आहेत. उरण येथील यशश्री शिंदे (Yashshree Shinde) हिच्या हत्येनंतर हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. त्या निमित्ताने हिंदुत्वनिष्ठ संघटनांची सरकारकडे थेट काही मागण्या केल्या आहेत.  (Love Jihad)

- प्रियंका लोणे, हिंदू जनजागृती समिती, संभाजी नगर.
– प्रियंका लोणे, हिंदू जनजागृती समिती, संभाजी नगर.

लव्ह जिहादविरोधी कायदा करून सरकारने रक्षा बंधनाची भेट द्यावी!

उरण येथे हिंदू तरुणीच्या झालेल्या निर्घृण हत्येने केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देश हादरून गेला आहे. यशश्री शिंदे या हिंदू युवतीची दाऊद शेख या धर्मांधाने क्रूर आणि निर्दयतेने हत्या केली, तिचा मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत सापडला. ही हत्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यातून झाली आहे म्हणजेच लव्ह जिहादसारख्या विळख्यातून. उरणमध्ये घडलेली घटना ही केवळ पहिली घटना नाही. लव्ह जिहादच्या षड्यंत्राखाली आमच्या हिंदू युवतींना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांची हत्या करण्याचे षडयंत्र अनेक दिवसांपासून, अनेक महिन्यांपासून सुरु आहे. ज्यात आमच्या असंख्य मुली बळी पडत आहेत. याआधी श्रद्धा वालकर असू दे की रुपाली चंदनशिवे असू दे, या अशा घटना समोर आल्या आहेत. यामुळे हिंदू समाजामध्ये लव्ह जिहादच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. अजून किती हिंदू मुलींचे बळी गेल्यावर सरकारला जाग येणार आहे. आज उत्तर प्रदेशात लव्ह जिहादविरोधी धर्मांतरबंदी कायदा झाला आहे. त्या धर्तीवर मी महाराष्ट्र सरकारला आवाहन करते की, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. त्यांच्या काळात एका महिलेचा विनयभंग करणाऱ्याचा कसा चौरंगा केला होता, असे उदाहरण आमच्यासमोर असताना राज्य सरकारनेही उत्तर प्रदेशप्रमाणे लव्ह जिहादविरोधी कायदा करावा आणि येत्या रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या लाडक्या बहिणींना त्यांच्या सुरक्षिततेची ही भेट हा लव्ह जिहादविरोधी आणि धर्मांतरविरोधी कायदा करून द्यावी, हे आवाहन आहे. (Love Jihad)

(हेही वाचा –केंद्रीय मंत्री Amit Shah म्हणतात; २०२९ मध्ये पुन्हा… )

- नयना भगत, प्रवक्ता, सनातन संस्था.

– नयना भगत, प्रवक्ता, सनातन संस्था.

घराघरात मुलींना धर्म शिक्षण द्या!

रुपाली चंदनशिवे असेल, श्रद्धा वालकर असेल, यशश्री शिंदे असेल, साक्षी असेल, या हिंदू तरुणींची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. ही न संपणारी शृंखला आहे. यावर आपल्याला वेळीच पायबंद घालायचा असेल, तर याच्या मूळ करणाकडे आपल्याला जायला पाहिजे. यावर मूळ उपाययोजना आपल्याला करावी लागेल. त्यासाठी आपल्याला मुला-मुलींना घराघरात धर्माचे शिक्षण द्यायला पाहिजे. पूर्वी मुलींना धर्माचे शिक्षण दिले जात होते. त्यांच्यावर धर्म संस्कार त्यांच्यावर करण्यात येत होते. म्हणून मुली कोणत्याही प्रलोभनाला अथवा खोट्या प्रेमाला बळी पडण्याऐवजी त्या स्वतः सक्षम होत होत्या. सक्षम पिढी त्यांनी घडवलेली आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवले, त्यांना धर्माचे शिक्षण दिले. म्हणून शिवरायांनी हिंदू धर्माची प्रतिष्ठा वाढवली. तसेच तुम्हा-आम्हाला हिंदू म्हणून मानाने जगता यावे यासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ते करत असताना त्यांनी स्वतः साधना केली आहे. आधुनिकतेच्या नावाखाली मुला-मुलींनी पाश्चात्य संस्कृतीच्या विकृतीला कवटाळले आहे. आधुनिकता म्हणजे छोटे कपडे घालायचे, एका हातात सिगारेट आणि एका हातात दारूचा ग्लास घ्यायची. अशी बीभत्स अवस्था आपल्या मुलींची झाली आहे. त्यामुळे आपल्या घराघरात हिंदू धर्म आणि हिंदू धर्म संस्कार शिकवण्याची काळची गरज आहे. यासाठी सनातन संस्था कटिबद्ध आहे. संस्थेच्या वतीने धर्मशिक्षण वर्ग घेतले जातात.

(हेही वाचा – Teachers Agitation : ६ ऑगस्ट रोजी शिक्षकांचे राज्यभर निघणार मोर्चे)

 प्रतीक्षा कोरगावकर, रणरागिणी शाखा, अहिल्यानगर.
प्रतीक्षा कोरगावकर, रणरागिणी शाखा, अहिल्यानगर.

शाळा-महाविद्यालयांमध्ये मुलींना स्वसंरक्षण द्या!

चार दिवसांपूर्वी उरणच्या यशश्री शिंदे या हिंदू तरुणीची दाऊद शेख याने अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. कर्नाटकातून पोलिसांनी दाऊद शेखला अटक केली. ही पहिली घटना नाही. या घटनेनंतर आपल्यापैकी अनेकांना श्रद्धा वालकर हिची आठवण झाली असेलच. सप्टेंबर 2022 मध्ये रुपाली चंदनशिवे (Rupali Chandanshive) हिला तिचा नवरा इक्बाल शेखने अक्षरशः गळा चिरून ठार केले. कारण तिने बुरखा घालायला नकार दिला होता. मे २०२२ मध्ये गोरेगावच्या १८ वर्षाच्या सोनम शुक्लाची महंमद अन्सारीने निर्घृण हत्या केली. काही दिवसांपूर्वी वांद्रे येथील मॉडेल रश्मी शहाबाजकर हिची तिचा नवरा अस्लमने ती इस्लाम स्वीकारत नाही म्हणून तिला बेदम मारहाण केली आणि तिला तलाकही दिला. एवढ्यावरच या लव्ह जिहादच्या घटना थांबलेल्या नाहीत. काही दिवसापूर्वीच महाराष्ट्र शासनाकडे आलेल्या अहवालानुसार मागील ३ वर्षांत १ लाखांहून अधिक महिला बेपत्ता आहेत. ही सर्वात महत्त्वाची आणि गंभीर गोष्ट आहे. अजून किती मुली बेपत्ता झाल्यावर सरकार जागे होणार आहे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. या बेपत्ता मुलींचे पुढे काय होते, हे जाणून घेण्यासाठी आता खरी समिती नेमली पाहिजे. ज्या दाऊदने यशश्रीची हत्या केली आहे, त्याला भर चौकात फाशी दिली गेली पाहिजे. तसेच योगी सरकारने जो अँटी रोमियो स्क्वॉड तयार केला तसा स्क्वॉड महाराष्ट्रात स्थापन करावा, जेणेकरून गावागावातील, शहरांतील मुली सुरक्षित राहतील. तसेच मुलींनाही आवाहन करायचे आहे, अजून किती दिवस गुंड येणार आणि आपल्याला मारून जाणार, या मानसिकतेत राहणार? आता महिला आणि युवतींनी स्वतःचे रक्षण स्वतः करायला शिकले पाहिजे. त्यासाठी सरकारने शाळा – महाविद्यालयांमध्ये मुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिले पाहिजे. हिंदू जनजागृती समितीच्या वतीने रणरागिणीच्या वतीने मोफत स्वसंरक्षण प्रशिक्षण दिले जात आहे. युवतींना अबला नाही तर रणरागिणी बनण्याची वेळ आली आहे. उठ भगिनी जागी हो, चंडी, दुर्गा गार्गी हो, अबला नको तू रणरागिणी हो, रणात लढणारी रणरागिणी हो !! (Love Jihad)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.