ठाण्यातील मनसेच्या राड्यावर Uday Samant काय म्हणाले?

180
उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर; Uday Samant यांची माहिती

ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) शेण आणि बांगड्या फेकण्यात आल्याने राजकीय वातावरण चांगलच तापले आहे. यावर मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मराठवाडा दौऱ्यामध्ये राज ठाकरे यांच्या गाड्यावर सुपाऱ्या फेकल्या. सुरुवात कोणी केली? मला वाटतं मनसैनिकांनी प्रतिउत्तर दिले आहे. असं ते म्हणाले.

(हेही वाचा –Sandeep Deshpande: तुम्ही शिवसैनिक, तर आम्ही महाराष्ट्रसैनिक, संदीप देशपांडेंचा इशारा)

उदय सामंत (Uday Samant) पुढे म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात उठाव केल्यानंतर ज्या हीन दर्जाने बोलले जात आहे ते आम्ही सहन करत आहोत. शाब्दिक हल्ले समजू शकतो पण त्यात महाराष्ट्रातील संस्कृती असली पाहिजे. राज ठाकरे यांनी त्यांच्या संघटनेसाठी केलेला दौरा होता त्याला डिस्टर्ब करायची गरज नव्हती. मनसैनिकांना शिवसैनिकांच्या साथीने कोणतीही कृती करावी लागेल इतके मनसैनिक दुबळे नाहीत. अशी परिस्थिती कोणी निर्माण केली याचा महाराष्ट्रातील जनतेने विचार केला पाहिजे. सुरुवातीला हे घडलं नसतं तर ठाण्यामध्ये त्याची प्रतिक्रिया आली नसती.” असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.

कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
गडकरी रंगायतनमध्ये राडा घालणाऱ्या मनसेच्या 44 कार्यकर्त्यांवर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाड्यांवर हल्ला करणे, गोंधळ घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. (Uday Samant)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.