#independenceday : स्वातंत्र्यदिनी ‘वंदे मातरम’ गायला ‘ना हरकत’ कोणी दिली?

110
#independenceday : स्वातंत्र्यदिनी ‘वंदे मातरम’ गायला ‘ना हरकत’ कोणी दिली?

भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश राजवटीत ‘गॉड सेव्ह द किंग’ हे इंग्रजांचे देशभक्तिपर गीत गाण्याची प्रथा रूढ करण्यात आली होती. मात्र देश स्वतंत्र झाला आणि पहिला स्वातंत्र्यदिन (#independenceday) साजरा करण्याच्या तयारीत असताना एका ब्रिटिश अधिकाऱ्याने मुंबई राज्यासाठी ११ ऑगस्ट १९४७ ला आदेश काढून ‘गॉड सेव्ह द किंग’ हे गीत गाऊ नये, असे आदेश काढले तसेच स्वातंत्र्यदिनी ‘वंदे मातरम’ गायला ‘ना हरकत’ दर्शवली.

कोण होता तो अधिकारी?

१५ ऑगस्ट १९४७ ला देश पहिला स्वातंत्र्यदिन (#independenceday) साजरा करण्याच्या तयारीत असताना चार दिवस आधी म्हणजे ११ ऑगस्टला, मुंबई राज्याचे मुख्य सचिव असलेल्या ब्रिटिश अधिकारी आय. एच. टौनटन यांच्यावतीने जे. चावेस यांनी मुंबई राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र लिहून १५ ऑगस्टला ‘गॉड सेव्ह द किंग’ हे गीत गाऊ नये, अशा स्पष्ट सूचना दिल्या तसेच ज्यांची इच्छा असेल त्यांनी ‘वंदे मातरम्’ हे गीत गायला हरकत नाही, असे त्यात म्हटले.

New Project 2024 08 12T155708.327

(हेही वाचा – #independenceday : देशाचा पहिला स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचे आदेश ब्रिटिशांनीच काढले?)

‘गॉड सेव्ह द किंग’चा इतिहास

‘गॉड सेव्ह द किंग’ हे गीत साधारण सतराव्या शतकातील असून १७४५ मध्ये लंडनमध्ये पहिल्यांदा सार्वजनिकरित्या सादर केलेले देशभक्तीपर गीत होते, जे एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला राष्ट्रगीत म्हणून ओळखले जाऊ लागले.

जुन्या गोष्टींना उजाळा

भारत देश येत्या गुरुवारी १५ ऑगस्टला ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करीत असताना काही जुन्या गोष्टींचा उलघडा नव्याने झाला आहे. देशाने पहिला स्वातंत्र्यदिन (#independenceday) साजरा केला त्यावेळी मुंबईला एका वेगळ्या राज्याचा दर्जा होता आणि राज्याचे मुख्य सचिव हे एक ब्रिटिश अधिकारी होते आणि त्यांनीच स्वातंत्र्यदिन कसा साजरा करावा याबाबचे आदेश काढले होते, हे अनेकांना माहीत नाही.

(हेही वाचा – Pune Crime: बनावट तिकिटाच्या माध्यमातून विमानतळात घुसण्याचा डाव फसला, पुणे विमानतळावर दोघांना बेड्या)

दस्तऐवज ठेवा उमेश काशीकर यांच्याकडे

महाराष्ट्राच्या राज्यपालांचे शासकीय निवासस्थान असलेल्या राजभवनचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर, ज्यांनी गेली अनेक वर्षे विविध राज्यपाल जवळून पाहिले आहेत त्यांनी आपले शासकीय कामकाज सांभाळत काही विषयांवर संशोधन केले. त्यात त्यांना काही जुन्या कार्यालयीन आदेश, शासकीय अधिसूचनांचा दस्तऐवज सापडला. आणि हा ठेवा काशीकर यांनी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. ‘हिंदुस्थान पोस्ट’शी त्यांनी खास बातचीत केली आणि देश पहिला स्वातंत्र्यदिन (#independenceday) साजरा करण्यापूर्वी आणि त्यानंतर प्रजासत्ताक दिनापर्यंत मुंबई राज्याच्या महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेतला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.