Manipur मधील तीन जिल्ह्यांत कर्फ्यू

74

मणिपूरमध्ये (Manipur) शांतता प्रस्थापित करण्याच्या मागणीसाठी सातत्यानं निदर्शनं सुरू आहेत. आता राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. लोकांना घरे सोडण्यापासून रोखण्यासाठी इंफाळ पूर्व आणि पश्चिम जिल्ह्यांमध्ये अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लागू करण्यात आला आहे, तर थौबलमध्ये भारतीय नागरी संरक्षण संहिता (BNSS) च्या कलम 163 (2) अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

(हेही वाचा Dnyanesh Maharao यांच्याकडून श्रीराम आणि स्वामी समर्थ यांच्यावर अश्लील टीका; कोल्हापुरात धार्मिक भावना दुखावल्याचा गंभीर गुन्हा दाखल)

जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले की, जिल्ह्यातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीमुळे कर्फ्यू शिथिल करण्यासंबंधीचे पूर्वीचे आदेश १० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजल्यापासून तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात आले आहेत, त्यामुळे पुढील आदेशापर्यंत तात्काळ प्रभावाने इंफाळमधील पूर्व जिल्ह्यात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. इंफाळ पश्चिमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आणखी एका आदेशात म्हटले आहे की, आधीचे सर्व आदेश रद्द करून १० सप्टेंबरसाठी कर्फ्यूमधील शिथिलता मंगळवारी (10 सप्टेंबर) सकाळी ११ वाजल्यापासून रद्द करण्यात आली आहे. तसेच, गेल्या वर्षी १ सप्टेंबरपासून लोकांच्या संबंधित निवासस्थानाच्या बाहेर जाण्यावरील बंदी उठवण्यात आली होती, असे आदेशात म्हटले आहे. यापूर्वी १० सप्टेंबर रोजी कर्फ्यू शिथिलता पहाटे ५ ते रात्री १० पर्यंत होती, परंतु नवीन आदेशात हे हटविण्यात आले आहे. मात्र, मीडिया, वीज, न्यायालये आणि आरोग्य यासह अत्यावश्यक सेवा कर्फ्यूच्या बाहेर ठेवण्यात आल्या आहेत. डीजीपी आणि सुरक्षा सल्लागार राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्यास असमर्थ असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. थौबलमध्ये कर्फ्यू लागू असल्याने पाच किंवा त्याहून अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.