Mandya (कर्नाटक) येथील गणेशोत्सव मिरवणुकीवर दगडफेक; पोलीस निरीक्षक अशोक कुमार निलंबित

108
Mandya (कर्नाटक) येथील गणेशोत्सव मिरवणुकीवर दगडफेक; पोलीस निरीक्षक अशोक कुमार निलंबित
Mandya (कर्नाटक) येथील गणेशोत्सव मिरवणुकीवर दगडफेक; पोलीस निरीक्षक अशोक कुमार निलंबित

मंड्या (Karnataka) येथील श्री गणेश विसर्जन मिरवणुकीवर केलेल्‍या आक्रमणाच्‍या प्रकरणी पोलीस निरीक्षक अशोक कुमार यांच्‍यावर कर्तव्‍यात निष्काळजीपणा केल्‍याचा ठपका ठेवत त्‍यांना निलंबित करण्‍यात आले आहे. पोलीस महानिरीक्षकांनी हा आदेश दिला. मंड्या (Mandya) येथील नागमंगल येथे श्री गणेशमूर्तीची विसर्जन मिरवणूक एका दर्ग्‍यासमोर येताच धर्मांध मुसलमांनी ‘अल्लाहू अकबर’च्‍या घोषणा देत त्‍यावर पोलिसांसमोरच पेट्रोलबाँबद्वारे आक्रमण केले. त्‍यांनी मिरवणुकीवर दगड आणि काचेच्‍या बाटल्‍या फेकून मारल्‍या, तसेच हिंदूंसमोर तलवारीही झळकावल्‍या.

नागमंगल येथे झालेल्‍या दंगलीप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी १५० आरोपींविरुद्ध गुन्‍हा नोंदवला असून २३ हिंदू, तर ३० मुसलमान, अशा एकूण ५३ जणांना अटक केली आहे, अशी माहिती मंड्या पोलीस अधीक्षक मल्लिकार्जुन यांनी पत्रकारांना दिली. ते म्‍हणाले की, नागमंगलमध्‍ये सध्‍या परिस्‍थिती नियंत्रणात आहे. दुकानदारांनी दुकाने उघडली आहेत. परिस्‍थिती पूर्वपदावर येत आहे. मोठ्या संख्‍येने पोलीस तैनात करण्‍यात आले आहेत. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी खबरदारी घेतली आहे. अटक केलेल्‍या ५३ जणांना न्‍यायालयात उपस्‍थित केले असता, न्‍यायालयाने त्‍यांना २५ सप्‍टेंबरपर्यंत न्‍यायालयीन कोठडीत ठेवण्‍याचा आदेश दिला.

मशीद हे दंगल घडवण्‍याचे केंद्र आहे का ? – प्रमोद मुतालिक

श्रीराम सेनेचे संस्‍थापक प्रमोद मुतालिक म्‍हणाले, ‘‘नागमंगलमध्‍ये उपद्रवींनी विसर्जन मिरवणुकीवर दगड, चप्‍पल आणि पेट्रोल बाँब फेकले आहेत. मशीद हे दंगल घडवण्‍याचे केंद्र आहे का? मशिदीसमोरून गणेश मिरवणूक जायला नको का ? ही पूर्वनियोजित दंगल आहे, पोलीसांना याची माहिती कशी नाही ?’’

काँग्रेस सरकार कर्नाटकला पाकिस्‍तान बनवत आहे ! – केंद्रीय मंत्री प्रल्‍हाद जोशी

केंद्रीय मंत्री प्रल्‍हाद जोशी म्‍हणाले, ‘‘श्री गणेशमूर्तीच्‍या विसर्जन मिरवणुकीवर झालेल्‍या आक्रमणाचा मी तीव्र निषेध करतो. मशिदीजवळून श्री गणेशमूर्तीच्‍या विसर्जन मिरवणूक नेऊ नये, असा कुठला कायदा आहे का ? काँग्रेस सरकार राजकीय तुष्‍टीकरणासाठी कर्नाटकला पाकिस्‍तान बनवत आहे. काँग्रेसला हिंदु सणांविषयी इतका राग का आहे? काँग्रेस सरकारने केवळ मतपेटीच्‍या राजकारणाचा विचार न करता उन्‍मादी शक्‍तींना रोखायला हवे. काँग्रेसच्‍या हिंदुविरोधी धोरणांमुळेच अशा प्रकारच्‍या दंगली आणि घटनांचा उद्रेक होत आहे. नागमंगल येथील घटनेसाठी राज्‍यातील काँग्रेस सरकारच उत्तरदायी आहे.’’

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.