Indian Wedding : भारतात नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणार ३५ लाख लग्न, ४.२५ कोटी रुपयांचा खर्च

Indian Wedding : २०२३ मध्येही या कालावधीत ३२ लाख विवाह झाले होते. 

55
Indian Wedding : भारतात नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणार ३५ लाख लग्न, ४.२५ कोटी रुपयांचा खर्च
  • ऋजुता लुकतुके

नोव्हेंबर ते न्यू ईयर हा जसा सणांचा आणि गुलाबी थंडीचा हंगाम आहे तसाच तो लग्नसराईचाही हंगाम आहे. यंदा या कालावधीत किंबहुना नोव्हेंबरपासून पुढे दीड महिना भारतात तब्बल ३५ लाखांच्या वर विवाह सोहळे पार पडणार आहेत. हा आकडा गेल्यावर्षीच्या तुलनेत पाच लाखांहून जास्त आहे. म्हणजेच गेल्यावर्षीही या कालावधीत ३० लाख विवाह संपन्न झाले होते. गोवा हे हल्लीच्या तरुण विवाहोत्सुक जोडप्यांसाठी सगळ्यात लाडकं ठिकाण आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या लग्नांवर देशभरात मिळून ४.२५ कोटी रुपये खर्च होणार आहेत. (Indian Wedding)

ही सगळी माहिती ‘बँडबाजा, बारात आणि शेअर बाजार,’ या पीएल कॅपिटल आणि प्रभूदास लिलाधर यांनी तयार केलेल्या अहवालात देण्यात आली आहे. जुलैच्या अर्थसंकल्पात सोन्याच्या आयात शुल्कात कपात केल्याने सण आणि लग्नाच्या हंगामात मोठ्या खर्चाला प्रोत्साहन मिळेल, असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. सोन्याच्या आयात शुल्क अलीकडेच १५ टक्क्यांवरून ६ टक्क्यांवर आलं आहे. (Indian Wedding)

(हेही वाचा – Shivadi Assembly Constituency : सुधीर साळवी यांना पक्षात घेण्याचे एकनाथ शिंदे यांचे प्रयत्न)

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स यांच्या आणखी एका अहवालानुसार, यंदा १५ जानेवारी ते १५ जुलै दरम्यान देशात ४२ लाखांहून अधिक विवाह पार पडले आहेत. त्यावर ५.५ लाख कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. सणासुदीच्या आणि लग्नाच्या काळात भारतीय शेअर बाजारातही तेजी असते, ज्याचे मुख्य कारण म्हणजे ग्राहकांच्या खर्चात झालेली वाढ. या वाढलेल्या मागणीचा रिटेल, हॉस्पिटॅलिटी, ज्वेलरी आणि ऑटोमोबाईल या क्षेत्रांना खूप फायदा होतो.(Indian Wedding)

भारतात, लग्न आणि सणासुदीच्या काळात एअरलाइन आणि हॉटेल बुकिंग यांसारख्या प्रीमियम वस्तू आणि सेवांवर जास्त पैसे खर्च केले जातात. ही वाढलेली मागणी कंपन्यांच्या नफ्याचे प्रमाण वाढवते, जे देशाच्या एकूण आर्थिक वाढीस समर्थन देते. अहवालात म्हटले आहे की, भारतातील २५ प्रमुख स्थळे लग्नाची ठिकाणे म्हणून ओळखण्याची आणि आंतरराष्ट्रीय विवाहसोहळ्यांसाठी भारताला सर्वोच्च पर्याय म्हणून प्रसिद्ध करण्याच्या सरकारच्या योजनेमुळे देशातील विदेशी चलन प्रवाहात वाढ होईल. देशभरातील सुमारे २५ प्रमुख स्थळे ओळखून हा उपक्रम सुरू केला जाईल. ज्यामध्ये भारत लग्नाच्या अनेक आवडीनिवडी कशा पूर्ण करू शकतो हे दाखवले जाईल. मेक इन इंडिया मोहिमेच्या यशावर आधारित, या धोरणाचे उद्दिष्ट अंदाजे १ लाख कोटी रुपये इतकं आहे. (Indian Wedding)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.