कोळी भवनाला निधी कमी पडून देणार नाही – मुख्यमंत्री Eknath Shinde यांची ग्वाही

55
कोळी भवनाला निधी कमी पडून देणार नाही - मुख्यमंत्री Eknath Shinde यांची ग्वाही
कोळी भवनाला निधी कमी पडून देणार नाही - मुख्यमंत्री Eknath Shinde यांची ग्वाही

कोळी बांधव (Koli Bhawan) हा मनमोकळ्या स्वभावाचा आहे. त्याच्या मनात एक अन् पोटात एक असं कधीचं नसतं. कोळी बांधव प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करतात. कोळी भवन पुन्हा पुन्हा बांधता येत नाही, यांच्यासाठी भव्य दिव्य वास्तू उभी करा. पैशाची चिंता करण्याची आवश्यकता नाही, निधी कमी पडू देणार नाही, असे उद्गार रविवारी (२२ सप्टेंबर) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. (Eknath Shinde)

नवी मुंबईच्या ऐरोली येथील भूमीपुत्र – प्रकल्पग्रस्त, कोळी – आगरी आणि महाराष्ट्रातील सर्व आदिवासी कोळी बांधवांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक इमारतीचे भूमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, कोळी हा दर्याचा राजा आणि मुंबईचा भूमीपूत्र आहे. या वास्तूचा वापर राज्यातील कोळी भूमीपूत्र घेतील. जी-20 चा मुंबईत कार्यक्रम होता तेव्हा जगभरातून लोक आले होते, त्यांनी कोळी गीतांना प्राधान्य दिले होते. कोळी बांधवांची गाणी त्यांचा नाच आणि त्यांचे संस्कृती पाहून परदेशातून आलेले पाहुणे खूष झाले होते .

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, भूमीपूत्रांना न्याय मिळाला पाहिजे. आपल्या सरकारचे एकच सूत्र, नोकरीत पहिला भूमीपूत्र जे प्रकल्प होत आहेत त्यामध्ये कोळी बांधवाचे मोठे योगदान आहे. राज्यामध्ये विकास पर्व सुरू झाले आहे. प्रकल्पांना आम्ही चालना दिली. तसेच कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. “मुख्यमंत्री लाडकी बहीण” योजना सुरू केली. महिन्याला १५०० रुपये देण्याचा निर्णय घेतला. युवकांसाठी “मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण” योजना सुरू केली. आपले राज्य देशातील पहिले राज्य आहे की, जे युवकांना प्रशिक्षण भत्ता देत आहे. 

राज्यात एकाच वेळी विकास आणि कल्याणकारी योजनाही सुरू आहेत. म्हणून हे शासन कमी वेळेत अत्यंत लोकप्रिय झाले आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. हे सरकार लोकांच्या मागण्या मान्य करते, म्हणून लोक प्रश्न घेवून आमच्याकडे हक्काने येतात.शासन सर्वसामान्याच्या आयुष्यात बदल घडविण्यासाठी असते. प्रत्येक समाजाला न्याय देण्यासाठी असते. कोळी बांधवाच्या दाखल्याच्या प्रश्नासाठी एक अभ्यास गट तयार करण्यात आला आहे. काही अडचणी आम्ही दूर केल्या आहेत. उर्वरित अडचणीही दूर केल्या जातील. हे सरकार खोटं बोलून दिशाभूल करणारे नाही. जे होणार आहे तेच आम्ही बोलतो आणि आम्ही जे बोलतो तेच करतो. हे अहोरात्र काम करणारे, लोकहिताचे निर्णय घेणारे सरकार आहे. प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यासाठी, भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी सरकार हात आखडता घेणार नाही. सर्व प्रकल्प व वास्तू लवकरच पूर्ण होतील. गरजेपोटी बांधलेली घरे अनधिकृत होती, त्या घरांना आता कायमस्वरूपी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या हक्काची घरे आहेत.आपण अतिक्रमण म्हणतो पण ती घरे आता कायम होणार आहेत. तुम्हाला न्याय नक्कीच मिळेल. मालकी हक्काने ही घरे आपण कायमस्वरुपी करीत आहोत. लवकरच त्याबाबत शासन निर्णय निघेल. (Eknath Shinde)

दशातील सर्वात मोठे पॅकेज आपण “वाढवण” च्या प्रकल्पग्रस्त कोळी बांधवाना देणार आहोत, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस पुढे म्हणाले की, मासेमारी करण्यासाठी चांगली व्यवस्था देणार आहोत. मच्छीमार बांधवाच्या बाजूनी उभे राहणारे आपले सरकार आहे. शेवटी या समाजाला नेता रमेश दादा पाटील यांच्यासारखा असावा, या शब्दात त्यांनी माजी आमदार रमेश पाटील यांच्या कामाचे कौतुक केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने  आमदार मंदा म्हात्रे, माजी आमदार गणेश नाईक, माजी आमदार व कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश दादा पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

(हेही वाचा – Pune-Bangalore National Highway Bypass वरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी 300 कोटी मंजूर)

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नरेश म्हस्के, आमदार मंदा म्हात्रे, ज्ञानेश्वर म्हात्रे, निरंजन डावखरे, प्रवीण दरेकर, माजी खासदार विनय सहस्रबुद्धे, माजी आमदार व कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश दादा पाटील, गणेश नाईक, संदीप नाईक,तसेच स्थानिक कार्यकर्ते विजय चौगुले, पंढरीनाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना शितपेटीचे वाटप करण्यात आले तसेच प्रधानमंत्री मत्ससंपदा योजनेतून “फिश ऑन व्हिल्स” वाहनाच्या चाव्या देण्यात आल्या.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.