Rahul Gandhi यांच्या पूर्वजांनी केलेली राष्ट्रघातकी पातके

67
Rahul Gandhi यांच्या पूर्वजांनी केलेली राष्ट्रघातकी पातके
Rahul Gandhi यांच्या पूर्वजांनी केलेली राष्ट्रघातकी पातके

सध्या पितृपक्ष सुरू आहे. आपल्या पितरांना शांती मिळावी, म्हणून पितृ पंधरवड्यात घरोघरी तर्पण, पितरे जेवायला घालणे यांसारखे विधी पार पाडले जातात. पितरांना शांती मिळाली नाही, पितृदोष असेल, तर प्रगति खुंटते, अनंत समस्या उभ्या राहतात, अशी धारणा आहे. पितृदोषाने ग्रस्त लोक विविध तोडगे शोधण्यासाठी जीवाचा आटापिटा करतात.

काँग्रेस (Congress) पक्षाचे पोस्टर बॉय आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या तीन पिढ्यांतील पूर्वजांनी अखंड, अनिर्बंध सत्ता उपभोगताना समाज आणि देशाच्या हिताला बाधक अशी अनेक राष्ट्रीय पातके केली आहेत आणि त्याचे फळ देश आजही काश्मीर प्रश्न, चीनबरोबरचा सीमावाद, सीमावर्ती राज्यांमधील वारंवार डोके वर काढणारा काँग्रेसच्या राजवटीत सातत्याने खालावत  गेलेली देशाची आर्थिक व सामाजिक परिस्थिति, अनेक गुणवंतांची उपेक्षा केल्याने झालेला ब्रेन ड्रेन अशा विविध रूपात आजही भोगतो आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील समर्थ सरकार आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील डबल इंजिन सरकार या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी वेगवेगळ्या योजनांची, नवनवीन कायद्यांची आखणी आणि अंमलबजावणी करण्याचे अथक परिश्रम गेले दशकभार करत आहेत आणि त्याचे फळ म्हणून भारताला जगभर महासत्ता म्हणून तर महाराष्ट्राला भारताच्या प्रगतीचे ढळढळीत उदाहरण म्हणून मान्यता देखील मिळत आहे.

(हेही वाचा – Waqf Board Law वर चर्चा करण्यासाठी २६ तारखेपासून ५ राज्यांमध्ये बैठक)

दुसऱ्या बाजूला राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्ष मात्र त्यांच्याच पूर्वजांनी केलेल्या कर्मांचे फळ म्हणून झालेल्या त्याच्या राजकीय वाताहतीला सातत्याने तोंड देत टिकून रहाण्याचा प्रयत्न करत आहे. याला काँग्रेस पक्षाला आणि नेहरू गांधी परिवाराला भोगावा लागत असलेला एक प्रकारचा पितृदोषच म्हणावे लागेल. स्वत: राहुल गांधी यांनी देखील वेळोवेळी वेगवेगळ्या देशव्यापी यात्रांच्या नावाखाली “बेबीज डे आऊट” देखील साजरे केले. यातील कोणत्याही प्रयत्नांना यश येताना दिसून येत नाही. उलटपक्षी एकेकाळी देशावर एकहाती अनिर्बंध सत्ता मनमानी पद्धतीने गाजवणाऱ्यांत आणि आपल्याला विरोध करणाऱ्या वेगवेगळ्या राज्यांमधील प्रादेशिक पक्षांना खच्ची करून दिल्लीतून तुघलकी कारभार करणाऱ्या काँग्रेस पक्षाला अधिकाधिक प्रमाणात प्रादेशिक पक्ष आणि कम्युनिस्टांच्या पाठिंब्यावर अवलंबून राहावे लागत आहे. एकेकाळी ज्यांनी सोनिया गांधींना विरोध करत काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि आपले स्वतंत्र प्रादेशिक पक्ष उभारले अशा महाराष्ट्रात शरद पवार, बंगालमध्ये ममता बॅनर्जी यासारख्या आणि ज्यांनी कॉंग्रेस पक्षाच्या सर्व शीर्षस्थ नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत देशभर आंदोलन करून राजकारणात पदार्पण करणाऱ्या अरविंद केजरीवाल संधीसाधू नेत्यांपुढे वारंवार लोटांगण घालण्याची नामुष्की काँग्रेसला सहन करावी लागत आहे.

काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर ही वेळ येण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांनी नेहरू-गांधी परिवारातील पूर्वासुरींच्या राष्ट्रीय पातकांचे परिमार्जन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न तर केलाच नाही, उलटपक्षी सत्तेच्या हव्यासापोटी राहुल गांधी आणि काँग्रेसच्या अन्य नेत्यांनी सातत्याने भारताच्या विरोधात भूमिका घेऊन देखील लपतछपत शी जिनपिंग यांची भेट घेणे, गलवान खोऱ्यात भारत-चीन (India-China) यांच्यात तणाव असताना चिनी राजदूताबरोबर पुख्खा झोडणे, देशात आणि परदेशात ठिकठिकाणी जाऊन भारतविरोधी भूमिका घेणाऱ्या संदिग्ध लोकांच्या भेटीगाठी घेणे आणि सातत्याने देशहिताच्या व जनहिताच्या योजनांना विरोध करणे अशी नवनवीन पापे ते करत राहिले.

नेहरू-गांधी परिवारातील पूर्वासुरींची कॉंग्रेस आणि राहुल गांधी यांना भोवत असलेली काही ठळक पातके 
  • काश्मीर प्रश्न
  • अक्साई चीन प्रश्न
  • पंजाबमधील फुटीरतावाद
  • आणीबाणी
  • चीन-पाकिस्तानचे लांगूलचालन
  • निधर्मी सरकारच्या नावाखाली देशविरोधी भूमिका घेणार्याल अल्पसंख्य समुदायाचे तुष्टीकरण
  • पुरोगामीत्वाच्या नावाखाली एका बाजूला जातीय ध्रुवीकरण करत असतानाच दुसऱ्या बाजूला दलित शोषित समाजाच्या हिताचा बळी देऊन त्यांना दाबून ठेवणे

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.