BMC : यंदाचा हिवाळा सुरु होण्यापूर्वी वेळीच सजग रहा, अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश

119
BMC : यंदाचा हिवाळा सुरु होण्यापूर्वी वेळीच सजग रहा, अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

वातावरणातील बदलांमुळे मुंबई महानगरासह संपूर्ण मुंबई प्रदेशातील हवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होत असल्याचे यापूर्वी आढळून आले आहे. प्रामुख्याने हिवाळ्यात हवेची गुणवत्ता खालावते, असा अनुभव आहे. या पार्श्वभूमीवर यंदाचा हिवाळा सुरु होण्यापूर्वी वेळीच सजग राहून उपाययोजनांना वेग देणे आवश्यक असल्याचे मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी सर्वच अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.

‘वातावरणीय बदल: हरित दृष्टिकोन विकसित करण्याची गरज’ या विषयावर महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या अध्‍यक्षतेखाली मुंबई महानगरपालिका मुख्‍यालयात मंगळवारी २४ सप्टेंबर २०२४ रोजी बैठक पार पडली. त्यावेळी गगराणी यांना विविध निर्देश दिले. अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, उप आयुक्‍त (घनकचरा व्यवस्थापन) संजोग कबरे, उपआयुक्‍त (उद्याने) किशोर गांधी, उपआयुक्‍त (पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग) मिनेश पिंपळे, उपआयुक्‍त (विशेष अभियांत्रिकी) यतिन दळवी, उप आयुक्त (पायाभूत सुविधा) उल्‍हास महाले, संचालक (नियोजन) प्राची जांभेकर यांच्‍यासह सर्व परिमंडळांचे उपआयुक्‍त, २४ प्रशासकीय विभागांचे सहायक आयुक्त, संबंधित अधिकारी, तसेच पर्यावरण व वातावरण बदल क्षेत्रातील संस्थांचे प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते. (BMC)

(हेही वाचा – Manoj Jarange यांच्या विरोधात गुणरत्न सदावर्तेंची कोर्टात याचिका! केले गंभीर आरोप)

जोखमींचा सातत्याने आढावा घ्‍यावा

यावेळी बोलतांना अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी, वायू प्रदूषणात वाढ होत असल्याचे आढळून आल्यास त्यास प्रतिबंध करण्याच्यादृष्‍टीने प्रभावीपणे उपाययोजना अंमलबजावणी करण्याची गरज यांनी म्हटले आहे. मुंबईत वातावरणीय बदलामुळे उद्भवणाऱ्या जोखमींचा सातत्याने आढावा घ्‍यावा, असे निर्देश त्‍यांनी पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागास दिले. महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये पर्यावरणीय जबाबदारीची जाणीव निर्माण केली पाहिजे, असेही डॉ. जोशी यांनी नमूद केले.

उघड्यावर कचरा जाळण्याचे प्रकार रोखा

वायूप्रदूषण नियंत्रित करण्यासाठी बांधकामाच्या ठिकाणांवर सक्त निरीक्षण, उघड्यावर कचरा जाळण्याचे प्रकार रोखणे आणि इंधन म्हणून लाकडाचा वापर यासारख्या स्रोतांवर तातडीने कारवाई करण्याचे महत्त्व यावेळी उपायुक्त (पर्यावरण) मिनेश पिंपळे यांनी पटवून दिले. मुंबईत वायू गुणवत्ता खालावलेल्या दिवसांची संख्या वाढत चालली असल्याने तात्काळ कृती करणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले. (BMC)

(हेही वाचा – Air Pollution नियंत्रण उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे महापालिका आयुक्तांचे निर्देश)

वायू प्रदुषणामुळे हे आजार संभवतात

वायू प्रदूषणामुळे जन्माच्या वेळी कमी वजन, अकाली जन्म आणि दीर्घकालीन आरोग्याच्या समस्या यांसारख्या गंभीर आरोग्य समस्या निर्माण होतात. तसेच हृदयविकार, न्यूरोलॉजिकल समस्या, अस्थमा आणि इतर आजार उद्भवू शकतात. त्यामुळे वायू प्रदूषणाचा परिणाम तात्कालिक नसून दीर्घकालीन असल्याने नागरिकांनीही आपापल्या स्तरावर उपाययोजना करुन महानगरपालिका प्रशासनाच्या प्रयत्नांना हातभार लावणे गरजेचे आहे, असेही त्यांनी नमूद केले. (BMC)

हेही वाचा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.