Lok Sabha election वेळी ४८ पैकी १४ मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा हल्लाबोल

हिंदूत्वाद्यांच्या पराभवासाठी संघटितरित्या मतदान

75
Lok Sabha election वेळी ४८ पैकी १४ मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा हल्लाबोल
Lok Sabha election वेळी ४८ पैकी १४ मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा हल्लाबोल

लोकसभा निवडणूकीत (Lok Sabha election) व्होट जिहाद (Vote Jihad) झाला. धुळ्यातील सहा पैकी पाच मतदारसंघात आघाडीवर असलेला उमेदवार केवळ मालेगाव मध्य मतदारसंघात १ लाख ९४ हजार मतांनी मागे जातो आणि ४ हजार मतांनी हरतो. त्यामुळे लोकसभा निवडणूकीत (Lok Sabha election) व्होट जिहाद (Vote Jihad)झाल्याचे स्पष्ट होते, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले. कोल्हापूरातील कणेरी मठ येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बोलत होते.

( हेही वाचा :  Aheri मतदारसंघावरून महाविकास आघाडीत बिघाडी )

पुढे फडणवीस म्हणाले की, निवडणूकीत हार जीत महत्त्वाची नाही. मात्र हिंदूत्वाला (Hinduism) पराभूत करण्यासाठी काही लोकांना संघटित करून मतदान करायला लावणे यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha election) ४८ पैकी १४ मतदारसंघात व्होट जिहाद(Vote Jihad) झाल्याचा आरोप ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला.

हिंदू मुलींना लग्नाचे आश्वासन देऊन नासवले

दरम्यान मुलींसोबत होणाऱ्या फसवणूकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आतापर्यंत एक लाखांहून अधिक घटना अशा आहेत. ज्यामध्ये हिंदू मुलींना लग्नाचे खोटे आश्वासन देऊन नासवले गेले आहे. हा लव्ह जिहाद आहे. मात्र लोकसभा निवडणूकीत (Lok Sabha election) व्होट जिदाह(Vote Jihad) सुद्धा घडला. दुत्व म्हणजे सहिष्णुता, समाजाला दिशा देणाऱ्यांनी आता समाजाला अजून जागे करायला हवे. आज देशात सांस्कृतिक वारसा पुढे नेणारे सरकार आहे. गोमाता आणि आपली संस्कृती पुढे नेणारे सरकारच आता आपल्याला हवे आहे, असे विधान ही फडणवीसांनी केले.

हेही पाहा  :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.