Khajur Jihad : बिया काढून टाकलेले खजूर खाण्यापूर्वी…, श्री श्री रविशंकर यांची धक्कादायक माहिती

खजूर हलाल (इस्लामिक पवित्र) करण्याचा प्रयत्न

180
Khajur Jihad : बिया काढून टाकलेल्या खजूर खाण्यापूर्वी..., श्री श्री रविशंकर यांची धक्कादायक माहिती
Khajur Jihad : बिया काढून टाकलेल्या खजूर खाण्यापूर्वी..., श्री श्री रविशंकर यांची धक्कादायक माहिती

देशभरात लव्ह जिहादच्या घटना घडत असताना आता ‘खजूर जिहाद’ चर्चेत आला आहे. याआधी थुंकी जिहादची अनेक प्रकरणे चर्चेत होती. त्यात आता प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर (Sri Sri Ravi Shankar) यांनी काही ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आलेले खजूरांचा चावा घेऊन त्यातून बिया काढल्या जातात, अशी धक्कादायक माहिती दिली. ज्यामुळे खजूर जिहादची (Khajur Jihad) मोठ्या प्रमाणाच चर्चा होत आहे.

( हेही वाचा :  Share Market Bloodbath : भारतीय शेअर बाजारात एकाच दिवसांत तब्बल २ टक्क्यांची घसरण

श्री श्री रविशंकर म्हणाले, मी समाजमाध्यमांवर एक व्हिडिओ पाहिला, ज्यात एका कारखान्यात बरेच लोक फुड पॅकिंग मशीनच्या लाईनसमोर उभे राहिलेले दिसतात. ते खजूरामधील बिया चावून काढत आहेत. त्याच्या म्हणण्यानुसार ते खजूरांना हलाल (इस्लामनुसार पवित्र) (Khajur Jihad) करत आहेत. ही खूप चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे बिया काढून टाकलेल्या बियांना स्पर्श करू नका, असे विधान ही रविशंकर (Sri Sri Ravi Shankar) यांनी केले.

तसेच खजूर हा इस्लामी देशात मोठ्या प्रमाणात पिकतो. त्यामुळे जर आपण घेत असलेल्या खजूराच्या पाकिटावर हलाल लिहलेले असेल तर तोंडी हलाल अर्थात खजूर चावून (Khajur Jihad) बिया काढले नसल्याची खात्री करा, असे ही रविशंकर म्हणाले. तसेच व्हिडिओ शेअर करत त्यांनी यासंदर्भात माहिती दिली.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.