VVIP च्या सुरक्षेत त्रुटी शोधण्यासाठी संरक्षण आणि सुरक्षा विभागाची बैठक

30
VVIP च्या सुरक्षेत त्रुटी शोधण्यासाठी संरक्षण आणि सुरक्षा विभागाची बैठक
  • प्रतिनिधी 

राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना (VVIP) देण्यात येणाऱ्या पोलीस संरक्षणाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागल्यामुळे मुंबई पोलिसांच्या संरक्षण आणि सुरक्षा विभागाकडून बैठक घेऊन पोलीस संरक्षणात कुठे त्रुटी आहे याचा आढावा घेण्यात आला आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसोबत एकाच वाहनातून प्रवास करण्यासाठी परवानगी नाकारणे, मार्गांमध्ये अचानक बदल करणे यासारख्या अनेक तक्रारी बैठकीत उपस्थित असणाऱ्यांनी नोंदविण्यात आलेल्या आहेत.

राज्याचे माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर १२ ऑक्टोबर रोजी रात्री वांद्रे पूर्व खेरनगर येथे गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळीबारात बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. बाबा सिद्दीकी यांना मुंबई पोलिसांचे संरक्षण होते, त्यांना तीन पोलीस गार्ड देण्यात आले होते, दोन गार्ड दिवस पाळीत एक गार्ड रात्रपाळी कर्तव्यावर होते. शनिवारी रात्री बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या वेळी एक पोलीस गार्ड तैनात होता, त्यावेळी सिद्दीकी यांच्या सुरक्षेत कुठेही चूक झाली असा प्रश्न अनेकांना पडला होता. या वेळी संरक्षण आणि सुरक्षा विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण झाल्यामुळे संरक्षण आणि सुरक्षा विभागाने तात्काळ बैठक बोलवून या घटनेचा आढावा घेत कुठे चूक झाली याची तसेच पोलीस गार्डच्या समस्या जाणून घेतल्या. संरक्षण आणि सुरक्षा विभागाने घेतलेल्या बैठकीत अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसोबत (VVIP) सुरक्षा अधिकारी (पीएसओ) म्हणून नियुक्त केलेल्यांनी उपस्थित केलेल्या तक्रारींपैकी आहेत. मुंबई पोलिसांचे १२ ऑक्टोबर रोजी लॉरेन्स बिश्नोई गँगच्या सदस्यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या केल्यानंतर काही दिवसांनी ही बैठक झाली.

(हेही वाचा – भाजपाच्या फायरब्रँड नेत्या Navneet Rana ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता )

बैठकीदरम्यान, सुरक्षा अधिकाऱ्यांनी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना (VVIP) सुरक्षित करण्यासाठी येणाऱ्या अडचणी सांगितल्या. अतिमहत्त्वाच्या व्यक्ती प्रोटोकॉलचे पालन करण्यास इच्छुक नसले तरीही त्यांना मूलभूत सुरक्षा उपायांवर कमी पडू नका असे सांगण्यात आले. तसेच एका अधिकाऱ्याने सांगितले की, संरक्षण आणि सुरक्षा युनिटमध्ये एक बैठक आयोजित करण्यात आली होती हे युनिट अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना आलेल्या धमक्यांना तोंड देण्यासाठी सुरक्षा प्रदान करते. बैठकीत अनेक पोलीस सुरक्षा अधिकाऱ्यांनी मुद्दे मांडले की व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींकडून (VVIP) त्यांच्या अनेक सूचना कशा ऐकल्या जात नाहीत ज्यामुळे त्यांना धोका निर्माण झाला. सुरक्षा अधिकाऱ्यांना सांगण्यात आले की, त्यांनी नेहमी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसोबत असावे. काही प्रकरणांमध्ये, उदाहरणार्थ, अतिमहत्त्वाच्या व्यक्ती सुरक्षा गार्डला त्यांच्या वाहनात बसू देत नाहीत कारण सुरक्षा गार्ड त्यांच्या संवेदनशील चर्चा ऐकतील म्हणून घाबरतात आणि त्यांना त्यांच्यासोबत दुसऱ्या वाहनात जाण्यास सांगितले जाते असे एका सूत्राने सांगितले.

इतर काही प्रकरणांमध्ये, अतिमहत्त्वाच्या व्यक्ती (VVIP) अचानक अशा एखाद्या व्यक्तीला भेटायचे ठरवतात जे सुरुवातीला त्यांच्या कार्यक्रमात नसतात ज्यामुळे त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. जेव्हा सुरक्षा गार्ड हस्तक्षेप करतात तेव्हा अतिमहत्त्वाच्या व्यक्ती त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत आणि नेहमीप्रमाणे पुढे जातात. जर सुरक्षा गार्ड खूप आग्रही असेल, तर अतिमहत्त्वाच्या व्यक्ती पोलिसांकडे तक्रार करून त्यांची बदली करून घेतात, अशी माहिती एका सुरक्षा गार्डने बैठकीत दिली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.