Maharashtra Assembly Poll : महाराष्ट्रात वातावरण फिरलंय; काँग्रेस नेत्याची कबुली

189
Maharashtra Assembly Poll : महाराष्ट्रात वातावरण फिरलंय; काँग्रेस नेत्याची कबुली
Maharashtra Assembly Poll : महाराष्ट्रात वातावरण फिरलंय; काँग्रेस नेत्याची कबुली

काँग्रेस पक्षात अंतर्गत धुसपुस सुरू झाली असून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून विरोध होऊ लागला आहे. पटोले यांच्या विरोधात पक्षात वातावरण तयार होत असल्याची कबुलीच काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना दिली. पटोले यांच्याकडून पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना आदराची वागणूक दिली जात नाही, तसेच त्यांना कोणत्याही निवडणूक प्रक्रियेत सहभागी करू घेतले जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचेही याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याची चर्चा आहे. (Maharashtra Assembly Poll)

(हेही वाचा- Mumbai तील 70 टक्के आगी इमारतींमध्ये असलेल्या सदोष विद्युत कामांमुळे)

आघाडीबद्दल नकारात्मक चित्र

दरम्यान राज्यात गेल्या काही दिवसांत महाविकास आघाडीच्या बाजूने असलेले जनमत महायुतीच्या बाजूने फिरल्याचे दिसून येत असल्याचे ‘त्या’ काँग्रेस नेत्याने सांगितले. शहरी भागात ‘लाडकी बहीण’ योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून ग्रामीण भागातही महाविकास आघाडीबद्दल नकारात्मक चित्र तयार झाले असल्याचे काँग्रेस नेत्याने स्पष्ट केले.  (Maharashtra Assembly Poll)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.