Pakistan मधील हिंदूंच्या ४०० हून अधिक अस्थीचे ८ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर होणार गंगेत विसर्जन; कराचीमधील महंत भारतात दाखल

46
Pakistan मधील हिंदूंच्या ४०० हून अधिक अस्थीचे ८ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर होणार गंगेत विसर्जन; कराचीमधील महंत भारतात दाखल
Pakistan मधील हिंदूंच्या ४०० हून अधिक अस्थीचे ८ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर होणार गंगेत विसर्जन; कराचीमधील महंत भारतात दाखल

पाकिस्तानी (Pakistan) हिंदूंचा (Hindu) एक समूह वाघा-अटारी बॉर्डरवर दि. ३ फेब्रुवारी रोजी ४८० अस्थी घेऊन भारतात आला. या अस्थी पाकिस्तानी हिंदूंच्या असून त्यांची मृत्यूनंतर अशी इच्छा होती की, त्यांच्या अस्थींचे विसर्जन गंगा नदीत प्रवाहित करावे. भारतात येणाऱ्या समूहात श्री पंचमुखी हनुमान मंदिराचे महंत रामनाथ मिश्रा (Ramnath Mishra) यांचा समावेश आहे, या कामासाठी त्यांची निवड केल्याबद्दल ते स्वत:ला भाग्यशाली मानत आहेत. (Hindu)

( हेही वाचा : REPO Rate Cut ? रिझर्व्ह बँक रेपो दरात कपात करणार?

वृत्तसंस्थेला माहिती देताना रामनाथ मिश्रा म्हणाले की, पाकिस्तानमधील (Pakistan) अनेक हिंदूंची इच्छा आहे की त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अस्थी गंगेत (Ganges) विसर्जित कराव्यात. त्याच्या कुटुंबाला त्याची शेवटची इच्छा पूर्ण करायची आहे. अशा परिस्थितीत, त्यांच्या अस्थी मंदिरांमध्ये कलशात सुरक्षित ठेवल्या जातात. जेव्हा पुरेशा संख्येने कलश जमा होतात, तेव्हा भारताचा व्हिसा मिळविण्याचा प्रयत्न केला जातो. अशा प्रकारे मृत व्यक्ती किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या शेवटच्या इच्छा पूर्ण होतात. आम्ही सुमारे ४००+ कलश आणले आहेत. या अस्थींना पाकिस्तानच्या (Pakistan) वेगवेगळ्या भागातून गोळा करण्यात आले आहे. या अस्थी मोक्ष प्राप्तीसाठी गंगेत विसर्जित केले जाणार आहेत. (Pakistan)

मिळालेल्या माहितीनुसार, महाकुंभमेळ्यादरम्यान (Maha Kumbh) अस्थी घेऊन भारतात येण्यासाठी या समूहाला व्हिसा मिळाला. सध्या त्याच्याकडे लखनऊ (Lucknow) आणि हरिद्वारला जाण्यासाठी व्हिसा आहे, पण ते प्रयागराजला (Prayagraj) जाण्यासाठी परवानगीची वाट पाहत आहे. या अस्थी विसर्जनाबद्दल सांगायचे झाले तर, ४ ते ते २१ फेब्रुवारी दरम्यान अस्थी दिल्लीतील सर्वात जुन्या आणि मोठ्या स्मशानभूमीत ठेवल्या जाणार आहेत. त्यानंतर त्यानंतर अनेक लोक येथे श्रद्धांजली वाहण्यासाठी येतील आणि २१ फेब्रुवारी रोजी वैदिक विधींसह अस्थी हरिद्वारला नेल्या जातील. २२ फेब्रुवारी रोजी सीता घाटावर त्यांचे विसर्जन केले जाईल. या दरम्यान १०० किलो दुधाचा अभिषेक केला जाईल.

दरम्यान पाकिस्तानातील (Pakistan) अनेक हिंदू आर्थिक अडचणीमुळे आणि इतर कारणांमुळे त्यांच्या नातेवाईकांच्या अस्थी स्वत: भारतात आणू शकत नाहीत. अशा परिस्थितीत या कामात मदत करू शकणाऱ्या व्यक्तीची ते वाट पाहत असतात. त्यांच्याकडे सिंधू नदीचा पर्याय असला तरी, गंगेत अस्थी विसर्जित करण्याचे प्रयत्न केले जातात. पाकिस्तानी हिंदूंच्या अस्थी भारतात आणण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी २०११ मध्ये आणि नंतर २०१६ मध्ये असे घडले होते. कराची मंदिराचे देखभाल करणारे रामनाथ यांनी २०११ मध्ये १३५ आणि २०१६ मध्ये १६० अस्थी भारतात आणल्या होत्या. यापैकी काही ६४ वर्षे जतन करण्यात आल्या. यावेळी, ४८० अस्थी आणताना, रामनाथ मिश्रा म्हणाले की, त्यांनी ८ वर्षांपासून अस्थी स्मशानात ठेवल्या होत्या. जेव्हा सरकारने त्यांना भारतात आणण्याची परवानगी दिली तेव्हा अस्थीच्या सुरक्षेसाठी त्याला पांढऱ्या प्लास्टिकच्या भांड्यात ठेवले, नंतर त्यावर लाल रंगाचे झाकण लावण्यात आले आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.