
मुंबई येथील विल्सन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शनिवार, २२ फेब्रुवारीला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट दिली. त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील सर्व उपक्रमांची माहिती घेतली. वीर सावरकरांचा (Veer Savarkar) जीवनपट दर्शविणारा लाईट अँड साऊंड शो पाहून मुले अधिक प्रभावित झाली.
१८५७ पासूनच्या स्वातंत्र्यलढ्यात ज्यांनी ज्यांनी सशस्त्र क्रांती केली, त्यांच्याविषयीचे सावरकर स्मारकातील भीत्तीचित्रे याप्रसंगी मुलांनी पाहिली. तसेच तिथे असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचेही दर्शन घेतले. त्याचबरोबर स्मारकातील विविध उपक्रमांच्या विषयी माहिती जाणून घेतली. वीर सावरकर (Veer Savarkar) यांनी अंदमानात शिक्षा भोगताना जो कोलू फिरवला, ज्यामुळे त्यांना भरपूर यातना सहन कराव्या लागल्या, त्या कोलूची प्रतिकृती पाहून मुलांना वीर सावरकर यांनी सहन केलेल्या यातनांची जाणीवही झाली.
(हेही वाचा – Ind Vs Pak : पाकिस्तानला सलग दुसरा झटका, बाबर आझम आणि इमाम आऊट)
स्मारकात दर शनिवार आणि रविवार लाईट अँड साउंड शो होतो, त्यावेळी दर आठवड्याला कोणत्या ना कोणत्या शाळेतील मुले किंवा संस्थेचे कार्यकर्ते हा शो पाहून प्रभावित होत असतात. जानेवारी महिन्यात अभिनव भारत संस्कृती ही रांगोळी क्षेत्रात काम करणारी पुण्यामधील संस्थेच्या वतीने शाळकरी मुले, त्यानंतर इंडियन एज्युकेशन सोसायटी या प्रथितयश शैक्षणिक संस्थेच्या दादर येथील ऍश लेन इंग्लिश स्कूलच्या प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांनी स्मारकाला भेट दिली होती.
यावेळी विल्सन कॉलेज (स्वायत्त) चे एनएसएस प्रोग्राम ऑफिसर डॉ. आनंद बुरंगे म्हणाले, आताच्या पिढीला ज्या गोष्टी माहित नाही त्या या लाईट अँड साऊंड शोच्या माध्यामातून पहायला मिळाल्या. वेगळ्या प्रकारची कलाकृती होती. मला असं वाटतं सर्वांनी हा शो पहायला हवा. वीर सावरकरांच्या आयुष्याला वेगळ्या पद्धतीने दाखवले आहे. चित्रपटासारखे स्वरुप, सिनेमाटोग्राफी अगदी वेगळ्या प्रकारची होती. ज्यामध्ये वीर सावरकरांचे चरित्र वेगळ्या पद्धतीने दाखविण्यात आले. वीर सावरकरांनी बऱ्याच क्रांतिकारकांना सुद्धा एक प्रेरणा दिली. ज्याप्रकारे या शो च्या माध्यमातून सादर केली ते खरोखर प्रेरणादायी होते. वीर सावरकर माझे आधीपासूनचं प्रेरणास्थान आहेत. मला वाटते की, अखंड भारत ही वीर सावरकराची संकल्पना खरचं महत्त्वाची आहे. खरे तर प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. आपला भारत आपल्या ताब्यात आहे, त्याचं रक्षण करणे हे या पिढीचे सगळ्यात मोठे कर्तव्य आणि दायित्व आहे. आणि त्याच्यासाठी सर्वांनी ठाम असले पाहिजे असेही डॉ. बुरंगे म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community