आनंद फाऊंडेशनद्वारे (Anand Foundation) दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात दि. १६ मार्च रोजी ‘आनंद जागर- उत्सव लोककलांचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील विविध प्रदेशांतील लोककलावंतांना एकत्र आणून ‘आनंद सफर’ घडवून या कलावंतांच्या लोककलांचा जागर करण्याचा कार्यक्रम सादर करण्यात आला. मार्च २०२५ पासून महाराष्ट्रातील विविध प्रदेशांतील लोककलावंतांना ‘आनंद सफर’ (Anand Safar) घडवून आणण्याचा आनंद फाऊंडेशनचा मानस होता. त्यामागे संस्कृतीची देवाण घेवाण आणि जतन केले जाईल, हा महत्त्वपूर्ण उद्देश होता. त्याचा शुभारंभ दि. १५ मार्चला मराठवाड्यातील लोककलावंतांपासून झाला.
( हेही वाचा : औरंगजेबाच्या कबरीवर बुलडोझर फिरणार म्हणून काँग्रेसचे…; Chitra Wagh यांची हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर टीका)
१६ मार्चला या आनंद सफरीची सांगता झाली. यावेळी ‘आनंद जागर उत्सव लोककलांचा’ या कार्यक्रमाद्वारे प्रतिभावान कलावंतांच्या लोककलेच्या प्रत्यक्ष सादरीकरण झाले. ही कार्यक्रमाची संकल्पना डॉ. गणेश चंदनशिवे (Dr. Ganesh Chandanshive) यांची आहे. अशा या अनोख्या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. या ‘आनंद सफर’च्या (Anand Safar) माध्यमातून मुंबई आणि आसपासची प्रमुख ठिकाणे त्यासंबंधित महत्वाची लोककलावंतांना देण्यात आली. यावेळी गावगड्यातील अनेक मातीतल्या लोककलांवतींनी आपले सादरीकरण केले. तसेच मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे (Lok Kala Academy) प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे (Dr. Ganesh Chandanshive) यांनी यांच्या विद्यार्थ्यांसह कार्यक्रमात नानाविधी लोककला प्रकार सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली.
गेल्या सहा वर्षांपेक्षा अधिक काळापासून हे कार्य ही संस्था करत आहे. आतापर्यंत १२ पेक्षा जास्त जिल्हे आणि ४०० पेक्षा जास्त गावातील हजारो महिलांना याचा लाभ मिळालेला आहे. या आनंद सफरीचा (Anand Safar) पाड्यांवर राहणारे आदिवासी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, कचरा वेचक सेविका, सेक्स वर्कर्स अशा अनेकांनी लाभ घेतला आहे. आता प्रवासातून आनंद इतकेच मर्यादित न राहता, या संकल्पनेला अनेक नवीन आयाम प्राप्त होत चालले आहेत, असा हा ‘आनंद’ वृक्ष नवनवीन संकल्पनांनी बहरू लागला आहे, अशी प्रतिक्रिया आनंद फाऊंडेशनच्या अध्यक्षांनी दिली.
आनंद फाउंडेशन (Anand Foundation) ही मुंबईतील एक अशी स्वयंसेवी संस्था आहे जी ग्रामीण महिलांना प्रवास आणि पर्यटनाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण, त्यांचे मानसिक आरोग्य, नेतृत्व संधी व त्यांचा आनंद मिळविण्यासाठी मदत करते. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील विविध गावांतील महिलांना कोणत्याही प्रकारचे शुल्क न घेता स्वप्नातील शहर दाखवण्यासाठी मुंबईत (Mumbai) आणतात. सामाजिक-आर्थिक घटकातील उपेक्षित, आदिवासी अशा महिलांवर लक्ष केंद्रित करतो. महिलांना त्यांच्या आत असलेल्या आनंदाची जाणीव करून देणे, त्यांना महिला सक्षमीकरण आणि महिला आरोग्य यांचे महत्व पटवून देणे. याची जाणीव करुन देणे हे या उपक्रमामागील उद्दिष्टे आहेत.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community