सुरक्षारक्षकांचे सर्वोच्च बलिदान सदैव प्रेरणा देत राहील: पंतप्रधान

90

संसदेवर 2001 साली झालेल्या हल्याच्या वेळी, कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या सुरक्षा रक्षकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आदरांजली अर्पण केली तसेच जवानांचे अभिवादन आणि स्मरण केले. ट्वीटरद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “2001 साली संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी आकर्तव्य बजावताना शहीद झालेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना आदरांजली अर्पण करतो. देशाप्रती त्यांची सेवा आणि सर्वोच्च बलिदान प्रत्येक नागरिकाला सदैव प्रेरणा देत राहील.”

13 डिसेंबर! काळा दिवस

काही तारखा आपल्यासोबत इतिहास घेऊन येतात. 13 डिसेंबर 2001 ही तारीखही इतिहासात नोंदवली गेली. भारतीय लोकशाहीला हादरवून सोडणारी ही तारीख. आजच्याच दिवशी दहशतवाद लोकशाहीच्या मंदिरापर्यंत पोहोचला. संपूर्ण देश सुन्न होता, संसदेवर हल्ला कसा काय होऊ शकतो ? असा प्रश्न प्रत्येकाला भेडसावत होता. भारतीय इतिहासातील एक काळा दिवस म्हणून या दिवसाची नोंद झाली. आज 20 वर्ष लोटल्यानंतरही भारताच्या अस्मितेवर झालेल्या या हल्ल्याचे घाव आजही कायम आहेत.

(हेही वाचा- कामाठीपुरातील राहणीमान ‘सुधारणार’!)

13 डिसेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात संसद भवनाचे रक्षण करताना आपल्या प्राणांची आहुती देणार्‍या हुतात्म्यांना सोमवारी देशाने श्रद्धांजली अर्पण केली आहे. संसद भवनात हुतात्मांना श्रध्दांजली अर्पण करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संसदेवर झालेल्या या हल्ल्यात नऊ जणांना आपला जीव गमवावा लागला आणि याशिवाय पाच दहशतवादीही मारले गेले. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता देशासाठी आपल्या प्राणांची आहूती देणा-या जवानांना देश सलाम करतो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.