आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना सरकार नोकरी देणार?

144

एसटी कर्मचा-यांचे आंदोलन अजूनही चालूच आहे. जोपर्यंत विलीनीकरण होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याच्या आपल्या भूमिकेवर कर्मचारी ठाम आहेत. त्यातूनच पगार वेळेत मिळत नसल्याने अनेक एसटी कर्मचा-यांनी आत्महत्या केल्या आहेत. आता या आत्महत्या केलेल्या कर्मचा-यांच्या कु़ुटुंबीयांना सरकार मदत करणार असे दिसून येत आहे, या मुद्द्यावर सरकार सकारात्मक असल्याचे दिसत आहे.

वारसांना देणार नोकरी  

महाराष्ट्रात आत्महत्या केलेल्या ३६ एसटी कर्मचा-यांच्या  वारसांना नोकरी देण्याविषयी सरकार सकारात्मक आहे. आत्महत्या कशामुळे झाल्या, याविषयी माहिती घेतली जात आहे. ज्या एसटी कर्मचा-यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, त्यांना ५ लाख रुपये देण्यात येतील, अशी घोषणा करण्यात आली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधानसभेत दिली.

सहानुभूतीने केला जातोय विचार

एसटी संपाच्या वेळी ३६ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. त्यांच्या वारसदारांना नोकरी देणार का ? असा प्रश्न सदस्या श्वेता महाले, मेघना चाकोरे आदी सदस्यांनी प्रश्नोत्तरात विचारला होता. त्या वेळी परब बोलत होते. परब पुढे म्हणाले की, एसटी महामंडळ कामगारांविषयी सहानुभूतीने विचार करत आहे. कर्मचा-यांच्या थेट वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इतर राज्यांमध्ये जसे पगार आहेत, त्याच्या तोडीचे काहींपेक्षा अधिक वेतन कर्मचा-यांना देण्यात आले आहे. तरीही कर्मचारी विलिनीकरणाविषयी अडून आहेत. काही कामगार कामावर आले आहेत, काही आलेले नाहीत, असे परब यांनी सांगितले.

 ( हेही वाचा :व्हीआयपी सुरक्षेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, आता महिला करणार..)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.