मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंवर का होतेय कारवाईची मागणी?

96

प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि दैनिक ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्राच्या संपादिका रश्मी ठाकरे यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान केला, अ‍ॅड. डॉ. जयश्री पाटील यांनी म्हटले आहे. रश्मी ठाकरे यांच्या विरोधात अ‍ॅड. डॉ. जयश्री पाटील यांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांकडे पत्राद्वारे तक्रार दाखल केली आहे. रश्मी ठाकरे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणीवजा तक्रार त्यांनी या पत्रात केली आहे.

नेमकं काय घडलं

प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित शिवाजी पार्क येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या देखील त्यांच्यासोबत उपस्थित होत्या. राष्ट्रगीतानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे राष्ट्रध्वजाला सलामी देत होते. मात्र, त्यावेळी रश्मी ठाकरे या स्तब्ध उभ्या होत्या.

Letter 2

राष्ट्रध्वजाचा अवमान झाला, असं अ‍ॅड. पाटील म्हणाल्या…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे राष्ट्रध्वजाला सलाम करत आहेत. पण, रश्मी ठाकरे या स्तब्ध उभ्या असल्याचे दिसत आहेत. त्यांनी ध्वजाला सलामी दिलेली नाही. यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान झालेला आहे. तसेच, त्यांच्या या कृतीमुळे लोकांच्या भावना दुखावलेल्या आहेत, असे अ‍ॅड. पाटील यांनी सांगितले आहे.

सोशल मीडियावर फोटो चर्चेत

या कार्यक्रमाचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत त्यापैकी एका फोटोत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे राष्ट्रध्वजाला सलाम करत आहेत. पण, रश्मी ठाकरे या स्तब्ध उभ्या असल्याचे दिसत आहेत. हा फोटो सध्या चांगलाच सोशल मीडियावर चर्चेत असल्याचे दिसतेय.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.