लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला! चौघांचा मृत्यू, २२ गंभीर जखमी

औरंगाबादेत वऱ्हाडी वाहनाला भीषण अपघात

94

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शिवराई फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला असून २२ जण गंभीर जखमी झाले आहेत. दोन आयशर ट्रकमध्ये झालेल्या या अपघातात एका गाडीत लग्नाचे वऱ्हाड होते. जखमींपैकी काहींना औरंगाबाद, तर काहींना नाशिकमधील रुग्णालयात दाखल केल्याची माहिती आहे.

औरंगाबादवरून नाशिककडे जाताना अपघात

लग्न समारंभासाठी जाणाऱ्या वऱ्हाडावर काळाने घाला घातला असून कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. वैजापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील औरंगाबाद लासूर रोडवरील शिवराई फाट्याजवळ हा भीषण अपघात झाला. या वाहनातून औरंगाबादवरून नाशिककडे लग्न समारंभासाठी वऱ्हाडी निघाले होते.

(हेही वाचा – बापरे! ई-बसची 17 वाहनांना धडक, 6 जणांचा मृत्यू ,तर…)

भीषण अपघातात चौघांचा मृत्यू

दरम्यान पहाटे तीन वाजेच्या सुमारास दोन आयशर गाड्यांमध्ये हा अपघात झाला. ही टक्कर इतकी भीषण होती की, अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर २२ जण गंभीर जखमी झाले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.