नाम गुम जाएगा चेहरा ये बदल जायेगा मेरी आवाज़ ही पहचान है…देशभरातून शोक व्यक्त

120

गाणसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे वयाच्या ९२व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, साहित्यिक अशा सर्व क्षेत्रात दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या जाण्यानंतर आता लता ताईंच्या स्वरांचे स्मरण देशातील कोट्यवधींना होऊ लागले आहे. ‘नाम गुम जायेगा, चेहरा ये बदल जायेगा, मेरी आवाज ही पहचान है’, हे गाणंच त्यांची खरोखरीच वेगळी ओळख ठरली आहे.

पोकळी भरून येणार नाही – पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लता ताई यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट वरून त्यांनी शोक व्यक्त केला, ते म्हणाले, मी शब्दांतीत झालो आहे. दयाळू आणि काळजीवाहू लता दीदी आम्हाला सोडून गेल्या. त्यांनी देशात एक पोकळी निर्माण केली आहे, जी कधीही भरली जाऊ शकत नाही. येणाऱ्या पिढीला भारतीय संस्कृतीतील एक दिग्गज म्हणून स्मरणात राहतील, ज्यांच्या मधुर आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अतुलनीय क्षमता होती.

(हेही वाचा स्वर्गीय सूर हरपला…गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्राणज्योत मालवली)

मातृतुल्य आशीर्वाद हरपला – मुख्यमंत्री

तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शोक व्यक्त केली आहे. ते म्हणाले, लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. स्वरसम्राज्ञी लतादिदी आपल्यातून देहाने नाहीशा झाल्या. हे अत्यंत दुःखद आहे. पण त्या त्यांच्या अमृत स्वरांनी अजरामर आहेत. अनादि आनंदघन म्हणून त्या स्वर अंबरातून आपल्यावर स्वरअमृत शिंपीत राहतील, अशा शोकमग्न भावनांसह मुख्यमंत्र्यांनी लतादिदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.