ठाणेकरांनो! ‘या’ भागात २४ तास पाणी पुरवठा राहणार बंद!

ठाणे शहरातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार

118

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यामार्फत बारवी गुरुत्व जलवाहिनीचे देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी दिनांक १० फेब्रुवारी रात्री १२.०० ते शुक्रवारी दिनांक ११ फेब्रुवारी, २०२२ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत २४ तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

‘या’ भागात असणार पाणी कपात

ठाणे शहरातील दिवा प्रभाग समिती, मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत मुंब्रा बायपास पासून मुंब्रा फायरब्रिगेड पर्यंत म्हणजेच किस्मत कॉलनी, चांद नगर, एम. एम.व्हॅली, अमृतनगर, अल्मास कॉलनी तसेच कळवा प्रभाग समितीमधील काही भाग व कोलशेत, वागळे इस्टेट मधील काही परिसराचा पाणी पुरवठा २४ तासांसाठी बंद राहणार आहे.

(हेही वाचा – राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय! मुंबई महापालिकेवर नेमणार प्रशासक! कारण…)

पुढील एक-दोन दिवस कमी दाबाने पुरवठा

या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.