पुलवामामध्ये हुतात्मा झालेल्या जवानांना पंतप्रधानांनी अर्पण केली श्रद्धांजली!

125

पुलवामा आतंकवादी हल्ल्याच्या स्मृतिदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हुतात्मा जवानांना आदरांजली अर्पण केली. “2019 साली याच दिवशी पुलवामामध्ये हुतात्मा झालेल्या सर्व जवानांना मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपल्या देशासाठी त्यांनी केलेल्या उत्कृष्ट सेवेचे स्मरण करतो. त्यांचे शौर्य आणि सर्वोच्च हौतात्म्य प्रत्येक भारतीयाला आपल्या देशाला सशक्त आणि समृद्ध करण्यास प्रेरित करेल.” असे ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.

( हेही वाचा : धक्कादायक! हिंदू मुलींना फसवण्यासाठी मुसलमानांचा ‘व्हॅलेंटाईन डे’ला काय आहे प्लान? )

पुलवामा हल्ला

जम्मू-काश्मिर येथील पुलवामामध्ये 14 फेब्रुवारी 2019 रोजी सीआरपीएफच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात 40 सीआरपीएफचे जवान शहीद झाले होते. त्यानंतर जवळपास बारा दिवसांनी भारतीय वायू सेनेने पाकव्याप्त काश्मिरातील बालाकोट येथे जबर हवाई हल्ले करीत दहशतवाद्यांची केंद्र नष्ट करीत सूड घेतला होता. भारताने 2019 च्या फेब्रुवारी महिन्यातच पाकव्याप्त काश्मिरात हवाई हल्ले केले आणि आतंकवाद्यांची ठिकाणे नष्ट केली. त्या हल्ल्याची प्रतिक्रिया म्हणून पाकिस्तानने एफ-16 या लढाऊ विमानांनी सीमेवर हल्ला केला.

विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांनी मिग 21 या विमानाच्या मदतीने विमान एफ-16 पाडले परंतु त्यांच्या विमानाला अपघात झाल्याने त्यांना आपत्कालीन परिस्थतीमुळे विमानातून उडी मारावी लागली आणि ते पाकिस्तानी सैन्याच्या हाती लागले. भारत सरकारने दाखविलेल्या राजकीय इच्छाशक्तीमुळे तसेच आंतरराष्ट्रीय समुदायाच्या दबावामुळे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांची सुटका पाकिस्तानला करावी लागली. याबाबत खुद्द संसदेत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी घोषणा केली होती. पाकिस्तानचे लढाऊ विमान एफ-16 पाडून अद्भुत शौर्याचा परिचय देणारे भारतीय वायु सेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना वीर चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.