‘भाजपला भुतानं झपाटलंय’, संजय राऊत भडकले

116

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. यावेळी राऊत म्हणाले, भाजपचे लोकं मराठी माणसांना संपवू पाहत आहेत. हे सगळे अन्वय नाईकांचे हत्यारे आहेत. किरीट सोमय्यांनी अन्वय नाईक यांना धमकावलं होते, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. ते पुढे धावतील आणि जनता त्यांच्या मागे लागेल त्यांची धिंड जनता काढेल, असे राऊत म्हणाले. त्यांना स्वप्नातही बंगलेच दिसतात, त्यांचे स्वत:चेच बेनामी बंगले असतील, असेही ते म्हणाले. त्या जागेवर एकही बंगला नाही. हा भुताटकीचा प्रकार आहे, भाजपला भुतानं झपाटलं आहे, असेही ते म्हणाले.

देशातील सर्वात मोठा चोर सोमय्या

राऊत पुढे असेही म्हणाले, भाजप अन्वय नाईकांचे हत्यारे असून आणि आता तेच त्या जमिनीवर जात आहेत. त्यांना कुठे जायचे त्या ठिकाणी जाऊ द्या, ते काय नेल्सन मंडेला आहेत? ते काय क्रांतीकारी आहेत काय? ते चोर आणि लफंगा आहेत, देशातील सर्वात मोठा चोर सोमय्या आहेत, असे राऊत यांनी एकेरी भाषेत सोमय्यांचा उल्लेख केला आहे. आता त्यांच्या विरोधात खंडणीचे गुन्हेही दाखल होणार आहेत. आता बघा त्यांचा खेळ खल्लास झाला आहे. ते जे पळत आहेत ते जेलच्या दिशेने पळत आहेत, हे बापलेक नक्की जेलमध्ये जाणार आहेत.

(हेही वाचा – मुख्यमंत्र्यांनी खुर्चीसाठी रश्मी ठाकरेंशी केली गद्दारी! सोमय्यांचा आरोप)

सोमय्यांनीही नाईक यांना दिल्या धमक्या 

अन्वय नाईक यांना आत्महत्या का करावी लागली यावर या लोकांनी चर्चा करायला हवी. नाईकांना ज्यांच्यामुळे आत्महत्या करावी लागली त्या गुन्हेगारांच्या समर्थनार्थ हे लोक उतरले होते. एका मराठी माणसाने भाजपच्या दबावामुळे आत्महत्या केली. कारण अर्णब गोस्वामीला हे लोकं वाचवत होते, या किरीट सोमय्यांनी देखील नाईक यांना धमक्या दिल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.