राऊतांच्या ‘त्या’ विधानाकडे पवारांनी केले दुर्लक्ष

98

महाविकास आघाडी सरकारच्या मागे लागलेला केंद्रीय तपास यंत्रणांचा फेरा काही संपता संपत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री नवाब मलिक यांना बुधवारी पहाटे ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्यावरुन पुन्हा एकदा केंद्रातील भाजप सरकारवर आघाडी सरकारमधील नेत्यांनी टीका करायला सुरुवात केली आहे.

भाजपवर आगपखड करण्याची एकही संधी न सोडणा-या संजय राऊत यांनी नवाब मलिकांना ताब्यात घेतल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली. 2024 पर्यंत हे सगळं चालेल त्यानंतर ते आहेत आणि आम्ही आहोत, असे राऊत म्हणाले. यावर शरद पवार यांनी ते काय बोलतात ते मला माहीत नाही, असे म्हणत राऊतांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केल्याचे पहायला मिळाले.

(हेही वाचाः किरीट सोमय्यांच्या आरोपांमुळे भाजपालाच बसणार फटका?)

काय म्हणाले राऊत?

नवाब मलिक यांच्यावरील कारवाईबाबत बोलताना संजय राऊत यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली. 2024 पर्यंत हे सगळं चालेल त्यानंतर ते आहेत आणि आम्ही आहोत. भाजप विरोधक आहेत किंवा जे सत्य बोलतायत त्यांच्याच मागे या तपास यंत्रणा एखाद्या माफिया टोळी प्रमाणे लावल्या जातात. पण आम्ही घाबरत नाही, ही लढाई चालू राहील. त्यांना तपास करुद्या कितीही खोट्या गोष्टी करुद्यात शेवटी सत्याचा विजय या देशात होतो. 2024 नंतर जे घडेल त्याची तपास यंत्रणांनी तयारी ठेवावी, असा इशारा राऊतांनी दिला. त्यावर शरद पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ते काय बोलतात ते माहीत नाही

राऊतांच्या या वक्तव्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना विचारले असते त्यांनी राऊतांच्या या विधानाकडे दुर्लक्ष केले. संजय राऊत काय बोलतात ते मला काही माहीत नाही आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी काही करत नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः मलिकांचं दाऊद कनेक्शन? ईडीने घेतलं ताब्यात अन्…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.