राणेंवरील कारवाईवरून शेलारांचा हल्लाबोल! काय म्हणाले? 

107

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. ईडीकडून करण्यात आलेल्या या कारवाईवरुन सत्ताधारी पक्षाकडून भाजपवर टीका केली जात आहे. या टीकेलाही आशिष शेलारांनी प्रत्युत्तर दिले. ‘केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईला राजकीय सूडबुद्धी म्हणणारे गप्प कसे? केंद्रीय मंत्र्यांची 8 ते 10 तास चौकशी करता न्यायालयाने जो गुन्हा गंभीर नाही, असे म्हटले. यावर एवढे तास चौकशी? नवाब मलिक यांचे समर्थन राज्य सरकार करत आहे. हा बेशर्मपणा आहे. मलिकांच्या राजीनाम्यासाठी भायखळा ते आझाद मैदानपर्यंत चक्का जाम आंदोलन करणार, अशी घोषणा भाजपचे आशिष शेलारांनी केली. तसेच या आंदोलनाचा विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही, असेही शेलार यांनी यावेळी स्पष्ट केले.

पिता-पुत्राने अहंकारापोटी कारशेडला विरोध  

आशिष शेलार यांनी राज्याच्या राजकाणातील विविध घटनांवर प्रतिक्रिया दिली. ‘मुंबईकर म्हणून मला दुःख होत आहे. मेट्रो 3 आणि मेट्रो 6 चे काम तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात जोरात सुरु होते. त्याला शिवसेनेकडून खोडा घालण्याचा प्रयत्न झाला. पिता-पुत्राने अहंकारापोटी कारशेडला विरोध केला. कांजूरला कारशेड होणार नाही हे माहीत असताना त्यांनी कारशेड हलवले. युवासेनेने 10 हजार कोटींचे नुकसान भरुन द्यावे. आज पुण्याच्या आधी मुंबई मेट्रो सुरु झाली असती, मात्र पिता-पुत्राच्या अहंकाराने हे होऊ शकले नाही. चार कारशेडचे गणित हे अशक्य आहे’, अशी टीका आशिष शेलारांनी केली.

(हेही वाचा शरद पवार राज्यपालांवर वैतागले! म्हणाले…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.