कुलाब्यात रात्रभर वीज गायब! नागरिक त्रस्त

115
मुंबईत नुकतेच ग्रीडमध्ये बिघाड झाल्यामुळे सर्वत्र अंधार झाला होता, त्यानंतर आता पुन्हा कुलाबा येथे १२ तास वीज नाही, त्यामुळे या भागात आता सोशल मीडियातून जोरदार चर्चा सुरु झाली आहे. यासंबंधी ज्येष्ठ पत्रकार सागरिका घोष यांनी यासंबंधी ट्विट करून त्याविषयीची माहिती दिल्यावर यावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय 

सागरिका घोष यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले कि कुलाबा परिसरात संपूर्ण रात्र वीज नव्हती, हे धक्कादायक आहे. पुन्हा सकाळी वीज गेली आहे. ज्येष्ठ नागरिकांनी यांची वीज नसल्याने इमारतींच्या लिफ्ट बंद झाल्या आहेत, त्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. तब्बल १२ तास वीज नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे, असे सागरिका घोष यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.