‘त्या’ चार ‘ईडी’च्या अधिका-यांची नावे का सांगितली नाही? राऊतांची ही नौटंकी

94

शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन ईडीच्या 4 अधिका-यांवर गंभीर आरोप केले. त्यावर लागलीच भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन राऊतांनी ईडीच्या अधिका-याची नावे का सांगितली नाही? राऊतांची ही नौटंकी होती, असा आरोप केला.

वाधवान यांच्यासोबत किरीट सोमय्या यांचे व्यावहारिक संबंध असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. त्यासंदर्भात काही संदर्भांचा उल्लेख करतानाच हे सर्व पुरावे पंतप्रधान कार्यालयाला पाठवणार असल्याचे ते म्हणाले. यासंदर्भात किरीट सोमय्यांनी स्पष्टीकरण दिले. माझा वाधवान यांच्याशी काहीही संबंध नाही. राऊत यांना मुंबई पोलिसांनी दोन पानांचे उत्तर दिले आहे. मात्र मी कोणत्याही पत्रकार परिषदेत अधिकृत कागद हातात असल्याशिवाय कोणता आरोप करत नाही, ते फक्त नौटंकी करत आहेत, असे किरीट सोमय्या म्हणाले.

(हेही वाचा ईडीचे ४ अधिकारी गजाआड जाणार! संजय राऊतांनी काय केला गौप्यस्फोट?)

माझ्या तक्रारीवर कारवाई होते

संजय राऊतांनी किरीट सोमय्यांवर ईडीचे पाचवे एजंट असल्याची टीका केली. त्यावर सोमय्यांनी प्रत्युत्तर दिले. मी ईडीचा पाचवा एजंट आहे. तर मग ईडीचे चार एजंट कोण आहेत? ईडी, सीबीआय, ईओडब्ल्यू, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय या सगळ्या ठिकाणी मी राज्यातले घोटाळे घेऊन जातो. मी दिलेल्या तक्रारींमध्ये दम असतो. म्हणून त्यातल्या काहींमध्ये कारवाई होत आहे, असेही सोमय्या म्हणाले.

ते न्यायाधीश ईडीचा पाचवा एजंट?

शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊतांनी सांगितले की नवाब मलिक मुस्लीम आहेत म्हणून त्यांना अटक केली. आता उच्च न्यायालयाने त्यांना जामीन दिला नाही, तर आता उद्धव ठाकरेंनी म्हणावे की, ते न्यायाधीश ईडीचे पाचवे एजंट आहेत. उद्धव ठाकरेंमध्ये एवढी हिंमत असेल, तर सामनामध्ये अग्रलेख लिहावा त्यांनी की, ते न्यायाधीश ईडीचे पाचवे एजंट आहेत. तिथे तर किरीट सोमय्या न्यायाधीश नाही ना? १९ बंगल्यांच्या बाबतीत बोलायची हिंमत का नाही उद्धव ठाकरेंची?, असा सवाल सोमय्यांनी केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.