संजय राऊत किती बोलतात…चॅनेल लागले की सुरू होतात! राज ठाकरेंनी नक्कल करत केली टीका

191

ते संजय राऊत किती बोलतात, काय बोलतात, सगळ्याची एक अॅक्शन असते. चॅनेल लागले तर हे सुरू, चॅनेल म्हटले तर हे बंद. मग नंतर यांचे पुन्हा कसे काय सुरू, काय चालले आहे, अशी शिवसेना नेते संजय राऊत यांची खिल्ली मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उडवली आहे. मनसेचा 16 वा वर्धापनदिन पुण्यात साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. मनसे पहिल्यांदाच मुंबईबाहेर म्हणजे पुण्यामध्ये वर्धापनदिन साजरा करत आहे.

भविष्यातील महाराष्ट्रातील पिढ्या तुम्हाला पाहतायेत

गेल्या काही दिवसांपासून खासदार संजय राऊत भाजपवर टीका करण्यासाठी पत्रकार परिषदा घेत आहेत. त्यावर आज राज ठाकरेंनी भाष्य केले. त्यावेळी राज ठाकरे म्हणाले की, ‘चॅनेल लागले तर हे सुरू, चॅनेल म्हटले तर हे बंद. मग नंतर यांचे पुन्हा कसे काय सुरू, काय चालले आहे. भविष्यातील महाराष्ट्रातील पिढ्या या पाहत आहेत, ते काय शिकतील? यांना फक्त निवडणुकीचे पडले आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.

(हेही वाचा शिवजयंती सण आहे, तिथीनुसारच साजरा करा! राज ठाकरेंकडून शिवसेनेची गोची)

16 वर्षांत लोक आपल्याकडे विश्वासाने येतात

राज ठाकरे पुढे म्हणाले की, सत्ताधारी म्हणतात आम्हाला संपवायला निघाले आहेत, विरोधी पक्ष म्हणतात आम्हाला संपवायला निघाले आहेत. टीव्हीवर शिव्या सुरू आहेत, हेच राजकारण वरती असेल तर ग्रामपंचायतीमध्ये काय सुरू असेल. महाराष्ट्रातील लोक यांना वैतागले आहेत. त्यामुळे त्यांना काही अडचणी आल्या तर ते सरकारकडे न जाता आपल्याकडे येतात हे आपले यश आहे. या 16 वर्षांत लोक आपल्याकडे विश्वासाने येतात, ही 16 वर्षे आपली कमाई आहे. गेल्या लॉकडाऊनमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी जे काम केले त्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, असेही राज ठाकरे म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.