केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पदरी निराशा! कारण काय वाचा

114

मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून महागाई भत्त्यात वाढ व्हावी अशी मागणी केंद्रीय कर्मचारी करत होते परंतु आता सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्ता (DA) आणि महागाई दिलासा (DR)यात वाढ करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. केंद्र सरकारने राज्यसभेत याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. सरकाच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे.

( हेही वाचा : आता डोंबिवली होणार प्रदूषणमुक्त! काय आहे नेमकं कारण? )

केंद्रीय मंत्र्यांचे स्पष्टीकरण

महागाई भत्त्यात ३ टक्क्यांहून अधिक वाढ करण्याची गरज नाही असे केंद्रीय अर्थमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत सांगितले. महागाई भत्त्यात वाढ होण्याबाबत मागील अनेक दिवसांपासून कर्मचारी मागणी करत आहेत तसेच डीएच्या दरात सुधारणा करण्याची गरज नाही असेही चौधरी यांनी राज्यसभेत सांगितले.

कर्मचाऱ्यांच्या पदरी निराशा 

केंद्रीय कर्मचाऱ्यांना ३१ टक्के महागाई भत्ता दिला जातो. होळीपूर्वी त्यात ३ टक्क्यांनी वाढ केली असता एकूण महागाई भत्ता ३४ टक्के झाला असता. सरकारच्या या निर्णयामुळे ५० लाखांहून अधिक सरकारी कर्मचारी आणि ६५ लाखांहून अधिक पेन्शनधारकांना याचा फायदा झाला असता. परंतु केंद्रीय मंत्र्यांनी राज्यसभेत दिलेल्या स्पष्टीकरणामुळे कर्मचाऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.