स्वत:चे अर्थचक्र चालवण्यासाठी युवराजांचा ‘आयपीएल खटाटोप’! काय म्हणते मनसे?

147

राज्यात होणा-या आयपीएलच्या सामन्यांत जी कंत्राटे दिली जात आहेत, ती परप्रांतीयांना दिली जात आहेत. त्यामुळे मनसेने यावर आक्षेप घेतला होता. मनसेच्या कार्यकर्त्यांनी आयपीएलच्या बसगाड्या फोडल्या होत्या. त्यामुळे आयपीएल आणि मनसे असा वाद निर्माण झाला आहे. गुरूवारी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी खोचक ट्वीट करत थेट शिवसेना नेते, मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले संदीप देशपांडे?

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रामध्ये आयपीएलचे सामने भरवून जर स्थानिक भूमिपुत्रांना फायदा होणार नसेल तर प्रश्न हा आहे युवराजांनी हा सगळा पुढाकार स्वतःच अर्थ चक्र फिरवायला घेतलाय की महाराष्ट्रच??, असे म्हटले आहे. महाराष्ट्रात आयपीएलचे सामने आयोजित करण्यात आले, पंरतु याचा फायदा स्थानिकांना होत नाही आहे. तर मग महाराष्ट्र सरकारने स्वतःच्या फायद्यासाठी आयोजन केले आहे का?, असा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.

(हेही वाचा Hijab Controversy: काय म्हणतायेत मुस्लिम महिला संघटना आणि वकील? जाणून घ्या)

महाराष्ट्रामध्ये आयपीएलचे सामने, पण कंत्राटे युपी, बिहारीला

महाराष्ट्र सराकरने पुढाकार घेतला होता. पर्यटन खात्याने पुढाकार घेतला होता. जर महाराष्ट्रामध्ये आयपीएलचे सामने भरवले तर त्यातून अर्थचक्र फिरेल, कुठले अर्थचक्र फिरतय? जर इथले लोकल वाहतुकीचे कंत्राट दिल्ली आणि युपीतल्या लोकांना मिळत असेल. जर इथे आयपीएलमुळे ज्या गोष्टी तयार होतात त्याची कामे इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना न मिळता बाहेरच्या लोकांना मिळत असेल तर कुठले अर्थचक्र फिरवण्याची आपण भाषा करतो आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले होते अर्थचक्र फिरणार मग काय स्वतःचे अर्थचक्र फिरण्यासाठी सामने भरवले आहेत की, महाराष्ट्राचे अर्थचक्र फिरवायला सामने भरवले आहेत. हा महत्त्वाचा प्रश्न असल्याचे मनसे नेते संदीप देशपांडे एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलतांना म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.