राऊतांनाही देशमुख आणि मलिकांच्या पंगतीत शिवभोजन जेवायला बसवावं, राणेंचा टोला

127

ईडीकडून संजय राऊत यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई सूडबुद्धीने करण्यात आल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार आगपखड करायला सुरुवात केली आहे. शिवसेनेवर कायम आक्रमक टीका करणा-या राणे बंधूंनी पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
राऊतांवर झालेल्या या कारवाईमुळे आता गुन्हा सिद्ध झाला आहे. त्यामुळे त्यांना अटक करुन देशमुख आणि मलिक यांच्या पंगतीत शिवभोजन जेवायला बसवावं, असा सणसणीत टोला भाजप आमदार नितेश राणे यांनी लगावला आहे.

(हेही वाचाः संजय राऊतांना ईडीचा दणका! मुंबई,अलिबागमधील संपत्ती जप्त)

काय म्हणाले राणे?

ईडीकडून संजय राऊत यांची अलिबागमधील संपत्ती आणि दादरमधील फ्लॅट जप्त करण्यात आला आहे. त्यांच्यावर झालेली या कारवाईमुळे त्यांनी गुन्हा केल्याचे सिद्ध झाले आहे. संजय राऊत यांनी पैशांचा गैरवापर करत भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे त्यांना बाहेर ठेऊन उपयोग नाही. त्यामुळे त्यांच्यावरील आरोप हे सिद्ध झाले असून त्यांना आता लवकरात लवकर अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यासोबत तुरुंगात शिवभोजन जेवायला बसवायला हवं, असा खोचक टोलाही नितेश राणे यांनी लगावला आहे.

(हेही वाचाः कारवाईनंतर शरद पवारांचा राऊतांना फोन! काय म्हणाले पवार?)

सामनातून इतके कोटी कमावले का?

ईडीने केलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया देताना ही संपत्ती आपण कष्टाच्या पैशातून खरेदी केली असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी टीका केली आहे. संजय राऊत यांनी सामनातील कष्टातून कोट्यावधींची संपत्ती कमावली का, असा थेट सवाल राणे यांनी केला आहे. इतक्या वर्षांपासून राऊत यांनी जो काळा पैसा कमावला आहे. तो कधी ना कधी बाहेर येणारच होता, असेही निलेश राणे यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः संजय राऊत म्हणतात… याची कल्पना होती, मला अटकही होईल!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.